शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

...आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:34 PM

आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल...

ठळक मुद्देडॉ. पुष्कर श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : राज्यातील जंगले आता उजाड होत चालली आहेत. शासनानेच काही आहे ते करावे अशी आपली मानसिकता कधी बदलणार? अशाने पर्यावरणाचे भले होणार नाही. आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल. झाडे ही टिकवावी लागतात. ती तोडावीच लागतात असे नाही. पर्यावरणाविषयक संवेदनशीलता हरपत चालल्यानेच की काय आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.  लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशन प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. संदीप श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या सोहळयाला प्रख्यात अभिनेते व पर्यावरणमित्र मिलिंद गुणाजी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, अभियंता दीपक मोडक, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मसापचे शहर प्रतिनिधी शिरीष चिट्णीस उपस्थित होते.  पर्यावरणाची दिवसेंदिवस होत चाललेली हानी यावर परखड मत व्यक्त करताना पुरंदरे म्हणाले, देशात खरोखर माणसे राहतात का? हा प्रश्न पडतो. आपण आपल्या देशातील पर्यावरणाची स्थिती बघावी मग आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करावा. जंगले उजाड होत चालली आहेत. गौरवशाली, वैभवशाली अशा सह्याद्री आता खुप उजाड पडला आहे. त्यावर झाड नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात पर्यावरणविषयक महत्वाचे विचार मांडले होते. याचा आपल्या सर्वांना विसर पडला आहे. जंगले वाचवा ती मरु देऊ नका. प्रत्यक्षात शहरातील माणसांच्या दारात साधी तुळसदेखील पाहवयास मिळत नाही. आमच्याकडे केवळ उत्सव साजरे केले जातात. दुसरीकडे झाडांवर क्रुर व निष्ठुरपणे हल्ले होतात. निदान प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. अशा शब्दांत बाबासाहेबांनी पर्यावरणविषयक भावना व्यक्त केल्या.  गुणाजी यांनी डॉ. श्रोत्री यांच्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. अँमेझॉनमधील प्राणी-पक्षी जीवन, निसर्गवाचन याबद्द्लच्या विविध छटा वाचकांना मनुच्या अरण्यातून वाचावयास मिळतील. याप्रसंगी त्यांनी आपल्या निसर्गप्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. जोशी म्हणाले, निसर्गाचे वेगवेगळे रुप त्याचा परिचय पुस्तकाच्या निमित्ताने पर्यावरण अभ्यासक व वाचकांना होईल. त्यात पर्यावरणविषयक जागृती तर आहेच याशिवाय त्याची संवेदनशीलता जपण्यात आली आहे. निसर्गाचा ºहास करुन मानवाची प्रगती होणार नाही. याचा विचार त्याने करण्याची गरज आहे.   

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेenvironmentपर्यावरणGovernmentसरकार