शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

आता रेशन दुकानांमधून मिळणार इंटरनेट; राज्यातील सात जिल्ह्यांत सुविधा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:52 IST

स्वस्त धान्य दुकानांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ म्हणून राज्य सरकारची मान्यता...

पुणे : देशभरात अनेक राज्यांमध्ये पीएम वाणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पालघर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील स्वस्त धान्य दुकानांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यातून नागरिकांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या दुकानदारांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. येत्या १ जानेवारीपर्यंत पुणे विभागातील ९ हजार २०० दुकानांमधून इंटरनेटची सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे.

डिजिटल इंडियाच्या क्रांतीनंतर राज्य सरकारने वायफाय क्रांती करण्याचा निर्धार केला असून सार्वजनिक ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिक इंटरनेटशी जोडले जाणार आहेत. रास्त धान्य सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून सुविधा देणार असून दुकानदार वायफाय राऊटर खरेदी करून दुकानात बसवतील. त्यातून ग्राहकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पुणे विभागातील धान्य दुकानदार संघटनेच्या ८० तालुकाध्यक्षांची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यात शहर, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह भारत नेट, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

या योजनेत प्रत्येक दुकानाबाहेर ४० फूट उंचीचे टॉवर उभारण्यात येणार आहे. तसेच ‘राऊटर’ही लावले जातील. त्यामुळे त्या दुकानापासून ३५० मीटरच्या परिघात असणाऱ्या विद्यार्थी, व्यावसायिकांसह गृहिणींना इंटरनेटचा वापर करता येईल. त्यासाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाणार आहे. यातून खासगी विक्रेत्यांपेक्षा सुमारे ५० ते ७५ टक्के स्वस्त दरात इंटरनेट सुविधा मिळेल. त्यामुळे रेशन दुकानदाराच्या उत्पन्नात भर पडणार आहे. भारतनेट अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स तयार केले जाणार आहेत, अशीही माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, “या योजनेसाठी आम्ही मोठा पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. मात्र, शहरात सर्वत्र इंटरनेट, वायफायची सुविधा आता उपलब्ध आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात या योजनेचा वापर होणार आहे.”

ग्रामीण भागातील डोंगराळ, दुर्गम भागात ‘सिग्नल’ मिळण्यास अडचण आहे. ‘वाय-फाय’मुळे तेथील नागरिक ‘रेंज’मध्ये येणार आहेत. या योजनेचा अनेकांना फायदा होणार असून धान्य दुकानदारांना उत्पन्नही मिळणार आहे.

- डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपायुक्त, पुरवठा शाखा विभागीय आयुक्तालय

टॅग्स :PuneपुणेInternetइंटरनेटsatara-acसाताराSolapurसोलापूरSangliसांगलीkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग