शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आता रेशन दुकानांमधून मिळणार इंटरनेट; राज्यातील सात जिल्ह्यांत सुविधा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:52 IST

स्वस्त धान्य दुकानांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ म्हणून राज्य सरकारची मान्यता...

पुणे : देशभरात अनेक राज्यांमध्ये पीएम वाणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पालघर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील स्वस्त धान्य दुकानांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यातून नागरिकांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या दुकानदारांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. येत्या १ जानेवारीपर्यंत पुणे विभागातील ९ हजार २०० दुकानांमधून इंटरनेटची सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे.

डिजिटल इंडियाच्या क्रांतीनंतर राज्य सरकारने वायफाय क्रांती करण्याचा निर्धार केला असून सार्वजनिक ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिक इंटरनेटशी जोडले जाणार आहेत. रास्त धान्य सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून सुविधा देणार असून दुकानदार वायफाय राऊटर खरेदी करून दुकानात बसवतील. त्यातून ग्राहकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पुणे विभागातील धान्य दुकानदार संघटनेच्या ८० तालुकाध्यक्षांची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यात शहर, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह भारत नेट, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

या योजनेत प्रत्येक दुकानाबाहेर ४० फूट उंचीचे टॉवर उभारण्यात येणार आहे. तसेच ‘राऊटर’ही लावले जातील. त्यामुळे त्या दुकानापासून ३५० मीटरच्या परिघात असणाऱ्या विद्यार्थी, व्यावसायिकांसह गृहिणींना इंटरनेटचा वापर करता येईल. त्यासाठी ग्राहकांना शुल्क आकारले जाणार आहे. यातून खासगी विक्रेत्यांपेक्षा सुमारे ५० ते ७५ टक्के स्वस्त दरात इंटरनेट सुविधा मिळेल. त्यामुळे रेशन दुकानदाराच्या उत्पन्नात भर पडणार आहे. भारतनेट अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स तयार केले जाणार आहेत, अशीही माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, “या योजनेसाठी आम्ही मोठा पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. मात्र, शहरात सर्वत्र इंटरनेट, वायफायची सुविधा आता उपलब्ध आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात या योजनेचा वापर होणार आहे.”

ग्रामीण भागातील डोंगराळ, दुर्गम भागात ‘सिग्नल’ मिळण्यास अडचण आहे. ‘वाय-फाय’मुळे तेथील नागरिक ‘रेंज’मध्ये येणार आहेत. या योजनेचा अनेकांना फायदा होणार असून धान्य दुकानदारांना उत्पन्नही मिळणार आहे.

- डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपायुक्त, पुरवठा शाखा विभागीय आयुक्तालय

टॅग्स :PuneपुणेInternetइंटरनेटsatara-acसाताराSolapurसोलापूरSangliसांगलीkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग