शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 12:52 PM

चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो

पुणे : ‘‘निळू फुले या नावाचे वजन कळतंय. मोठा माणूस. समाजभान, चतुरस्त्र कलाकाराव्यतिरिक्त आपण समाजाला काय देत आहोत, कलाकार केवळ तीन तासांसाठी आहोत, बाकीचे २१ तास महत्त्वाचे आहेत, त्यात आम्ही काय करतो, त्यावरून समाजभान कळतं, अशा भावना अभिनेता सुमित राघवन यांनी व्यक्त केल्या.

निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंचातर्फे यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान’ राघवन यांना अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. ५) प्रदान करण्यात आला. यावेळी गार्गी फुले, समीर बेलवलकर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याआधी वैभव जोशी आणि गार्गी फुले यांनी पावसाच्या कविता सादर केल्या.

राघवन म्हणाले, ’’आम्ही कलाकार आहोतच, कलेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. पण बरेचदा असं होतं की, आपल्याला माणूस म्हणून काय वाटतं. घराबाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा काय संदेश बाहेर देतो. ते महत्त्वाचे असते. नुसतं फेसबुकवर, इन्स्टावर रिल्स टाकून काहीही होत नाही. चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो.’’

खेडेकर म्हणाले, ’’निळूभाऊंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती आहे. इतक्या मोठ्या माणसाचा सन्मान तुम्ही आणखी किती पुढे घेऊन जाता, याची जबाबदारी वाढते. आपल्याकडे वय झाल्यावर पुरस्कार देतात. त्याचा काय उपयोग? कारण पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन पुढे ते काम करू शकतील ना !’’

निळूभाऊ ‘बाई वाड्यावर या’पुरते नाहीत !

‘बाई वाड्यावर या’ केवळ या वाक्यापुरते निळूभाऊ नाहीत. ते खूप समाजभान असलेले व्यक्ती होते. कलाकार होते. परंतु, एकाच भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा वाईट केली. ते माणूस म्हणून कितीतरी चांगले होते, ते लोकांना समजावेत, यासाठी हा कृतज्ञता सन्मान आम्ही देतोय, अशा भावना गार्गी फुले यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :Puneपुणेartकलाcultureसांस्कृतिकcinemaसिनेमाEducationशिक्षणFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम