शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

एल्गार प्रकरण: एनआयएच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी; सरकार आणि बचाव पक्षाने मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 3:06 AM

एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जावर बाजू मांडण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने सोमवारी न्यायालयात करण्यात आली.

पुणे : एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जावर बाजू मांडण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने सोमवारी न्यायालयात करण्यात आली. यावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील सुनावणी सहा फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच एल्गार आणि कथित माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा निर्णय या वेळी होणार आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयात अर्ज करून या प्रकरणाची कागदपत्रे पुरविण्यात यावीत तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवावा, असा अर्ज केला आहे.

एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर बाजू मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली. तर तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एनआयएच्या अर्जावर युक्तीवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. राज्याचे पोलीस महासंचालक यांना तपास अधिकाºयांनी याबाबत पत्र पाठवले आहे. त्यावर अद्याप उत्तर आलेले नसून गृह विभागाचे पत्र येण्याकरिता वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

एनआयएचे तपास अधिकारी विक्रम खलाटे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयए अ‍ॅक्ट २००८ अन्वये या प्रकरणासंदर्भातील पुढील कार्यवाही एनआयए करणार आहे. केंद्र सरकारचे सचिव धर्मेंद्र कुमार यांनी लेखी पत्र एनआयएसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे. एनआयएने एनआयए पोलीस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा दाखल केला आहे.

‘एनआयएवर विश्वास नाही’-आनंदराज आंबेडकर

नागपूर : कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्य सरकारने सीआयडीमार्फत करावी, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये. तसेच या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एनआयएकडून देशद्रोह; युद्धाच्या कटाच्या कलमांचा समावेश

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) नव्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात एल्गार परिषदेत सहभागी कार्यकर्त्यांवर देशद्रोह आणि भारत सरकारविरूद्ध युद्ध पुकारण्यासंबंधित भारतीय दंड विधान कलमांचा समावेश केला आहे . पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात दंड विधान कलमे वगळण्यात आली होती. मात्र २४ जानेवारीला दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचा समावेश आहे.

गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्यासह २३ जणांविरूद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात भादंवि कलम १२१ (भारत सरकारविरूद्ध युद्ध छेडणे) आणि १२४ (अ) (देशद्रोह) आणि १२१ (अ) (कट) यांचा समावेश आहे. केंद्राने एल्गार परिषद चौकशीची जबाबदारी एनआयएकडे सोपवली. त्यानंतर एनआयएने कलम १३३ ए (असंतोष वाढविणे), ५०५ (१) (बी) (भय निर्माण करणे), ११७ (सार्वजनिक किंवा दहापेक्षा जास्त व्यक्तींकडून गुन्हेगारीचे कमिशन) आणि ३४ (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले कृत्य). एनआयएने कलम १ ((बेकायदेशीर कृत्यांसाठी दंड), १ ((दहशतवादी कृत्याची शिक्षा), १ (कट रचनेची शिक्षा), १ बी यांचाही समावेश केला आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMaharashtraमहाराष्ट्र