शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे ...

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्याकडे सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत सांगितले.

-----------

देशातील सध्याच्या कोरोनाच्या स्थितीबाबत काय सांगाल? दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

- देशात लॉकडाऊनमध्ये लोकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. आपल्याकडची पहिली लाट अजूनही ओसरलेली नाही. ती ओसरत नाही तोवर दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. दुसरी लाट दिसत नसली तरी वेगवेगगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखु शकु. इतर देशांमध्ये जो परिणाम दिसतोय तो आपल्या देशात दिसणार नाही.

---------

जगभरात सुरू असलेल्या लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?

- जगात यापुर्वीही कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारताता आठ लसी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने लसीची परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक असली तरी चालेल, असे म्हटले होते. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाईक प्रोटिनचा वापर करण्यात आला आहे. भारतातही या प्रोटिनचा वापर झाल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.

---------------

लसीचा एक डोस घेतल्यानंतर हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?

- चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो (अपरिणामकारक लससदृश द्रवपदार्थ) दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला ते पाहावे लागेल. तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. एकच डोस घेऊन जर आपण दक्षता घेतली नाही तर ते चुकीचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.

-----------------

कोरोनाला रोखण्यासाठी भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?

- काही अभ्यासांनुसार ५५ ते ८० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणता येईल. आपल्याकडे सप्टेंबरमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे. आता हे प्रमाण किती असेल, हे आताच सांगता येणार नाही. पण आपण निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार लसीकरण करण्यासाठी जुन-जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत २५ कोटींचा आकडा काहीप्रमाणात वाढलेला असेल. त्यावेळी हर्ड इम्युनिटीचा अंदाज बांधता येईल. त्यानुसार पुढील लसीकरण करावे लागेल.

--------------

आपले आयुष्य ‘न्यु नॉर्मल’ कधी होईल?

- आपण लस घेतली म्हणजे सुरक्षित नाही. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर एक महिना होत नाही तोपर्यंत आपल्याला मास्क, शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता या नियमांचे पालन करून जगणे आवश्यकच आहे. पुर्ण लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यु नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही.

--------------

चौकट १

गर्दी वाढूनही रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याने हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे का, याविषयी बोलताना ते म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही इथपर्यत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय. काही देशांतील परिस्थितीकडे पाहून असे वक्तव्य काहींनी केले असेल. त्याच्याशी आपली तुलना करणे योग्य नाही. आपल्याकडे अजून पहिली लाटच संपलेली नाही. अशा परिस्थितीत लस न देणे, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल.

---------------

चौकट २

जोखीम घ्यायला हवी

मानवी चाचण्यांदरम्यान देण्यात आलेल्या लसींचा दुष्परिणाम जास्त असता तर तो पहिल्या दोन महिन्यांमध्ये दिसला असता. त्यामुळे याचा फार मोठा दुष्परिणाम होईल, अशी भिती मनात ठेऊ नये. काही दुष्परिणाम लसीकरणानंतर दीड वर्षानंतरही दिसू शकतात. पण याकडे आपण फायद्याच्या दृष्टीने पाहायला हवे. कारण ९५ टक्के लोकांमध्ये आता दुष्परिणाम दिसलेले नाहीत. त्यामुळे थोडी जोखीम उचलायला हरकत नाही.

--------------