शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांवर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये ...

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. शालेय वयापासून मुलींना कराटेसारखे प्रशिक्षण देण्याची गरज आहेच; मात्र, सर्वात जास्त गरज आहे ती मुलांवर चांगले संस्कार करण्याची, स्त्रीसन्मानाचे धडे गिरवण्याची. ‘तू स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे’, ही बाब लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज असते. मुलांसाठी असे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रमात याबाबतच्या शिक्षणाचा समावेश करण्याची नितांत गरज आहे.

दररोज बलात्काराची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडे काही ‘अॅक्शन प्लॅन’ आहे की नाही, हेच कळायला तयार नाही. अनेकदा १०० क्रमांकावर संपर्क साधला तरी फोन उचललाही जात नाही. ‘प्रतिसाद’ अॅपचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शहरात विविध ठिकाणी सुमारे १५०० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ते कार्यरत आहेत की नाही, याबाबतही कल्पना नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांनी आता ठोस अॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. दररोज अशा घटना घडत असतील तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत? केवळ निवेदने स्वीकारून बदल घडणार नाहीत, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी बलात्कारांच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

कोथरूडमध्येही दररोज टेकडीवर फिरायला जाणा-या महिलांना वाईट अनुभव येतात. परवाच कोथरूडमध्ये एक ताई सकाळी ९ वाजता आपल्या लहान मुलाला घेऊन गोपीनाथनगर टेकडीवर लहान मुलाला घेऊन गेल्या असताना एका तरुणाने असभ्य वर्तन केले. अशा घटना वारंवार घडत असूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. महिलांची सुरक्षितता, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जपली जाणार आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांपैकी किती जणांचे व्हेरिफिकेशन केले जाते, याचा आकडा पोलिसांकडे नाही. बाहेरुन आलेल्या आणि भाड्याच्या घरामध्ये राहणा-या लोकांची एकत्रित नोंद उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना यंत्रणेकडून तातडीने झाल्या पाहिजेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन अॅड. वैशाली चांदणे यांनी वकिलांना केले आहे, याबाबत मी त्यांचे अभिनंदन करते. विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि यंत्रणेला ‘ती’चा गणपती सदबुद्धी देवो, हीच प्रार्थना!