शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

"लखीमपूऱच्या ताज्या घटनेवर मोदींनी भाष्य करावे", पुण्यातून काँगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 6:52 PM

केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक अशी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटलांची टीका

ठळक मुद्देसमाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे

पुणे: उत्तरप्रदेशात लखीमपूरमध्ये मारले गेलेले शेतकरी आंदोलनांमधीलच होते. पंतप्रधान मोदी यांनी आता तरी मौन सोडून भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेसभवनमध्ये मंगळवारी दुपारी पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी म्हणून निघाल्या. उत्तरप्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले, या घटनेचा काँग्रस निषेध करत आहे. वर्ष होत आले शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीत आंदोलन करत आहेत व मोदी त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. लखीमपूऱच्या ताज्या घटनेत एकदोन नाही तर आठ शेतकरी प्राणाला मुकले आहेत, किमान त्यावर तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांनी बोलावे अशी आमची मागणी आहे.

''केंद्र सरकार विदेशी कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालत आहेत. त्यांची आर्थिक धोरणे देशाला मारक होत आहेत. समाजाचा एकही घटक समाधानी नाही. देशातील मध्यमवर्गाची मोदी फसवणूक करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला.''

''काँग्रेसनेच नेहमीच जबाबदारीने कारभार केला. मोदी यांच्या सरकारमध्ये जबाबदारीच दिसत नाही अशी टीका पाटील यांनी केली. महाराष्ट्र काँग्रेस चांगले काम करत आहे, समाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे असा दावा पाटील यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोले यांच्या हस्ते पाटील यांचे स्वागत केले.''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी