शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 11:57 IST

कुटुंबातील पालकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने छोट्या छोट्या कारणांनी वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे..

ठळक मुद्देपालकांमधील विसंवाद ठरतोय मुलांच्या नैराश्यामागील कारण 

युगंधर ताजणे

पिंपरी : लॉकडाऊनमुळे आई बाबा दोघेही घरात आहेत.  त्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहे. सतत छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांच्यात वाद होत आहेत. कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने मोठी अडचण आहे. कुठे खेळायला जाता येत नाही. फिरता येत नाही, मित्रांना भेटायला जाता येत नाही. सुरुवातीला आम्हाला कधीही वेळ न देणारे आईबाबा आता स्वत:च सारखे भांडायला लागल्याने त्याचा राग आमच्यावर निघत असल्याची तक्रार लहान मुलांबरोबरच तरुणांची देखील आहे. 

 घरी भाजी घेऊन येताना ती रस्त्यात सांडल्याने आई वडिलांचा ओरडा खावा लागला. याचा राग आल्याने एका चिमुरडयाने बाथरुम मध्ये गळफास घेतला. बहिणीबरोबर झालेले भांडण यावर घरच्यांकडून झालेला अपमान सहन झाल्याने तरुणाने स्वत:ला संपवले. चौदा वर्षाच्या एका मुलाने घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची घटना घडली. लॉकडाऊनच्या काळात क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या करण्याच्या 20 पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. वर्षभरात भारतात दोन ते अडीच लाख आत्महत्या होतात. त्यातील अधर््याहून वयवर्षे 15 ते 30 या वयोगटातील आहेत. तरुणगटाचे प्रमाण अधिक आहे. याबाबत अधिक माहिती देताना ज्ञानदेवी चाईल्ड लाईनच्या संचालक अनुराधा सहस्त्रबुध्दे म्हणाल्या, लॉकडाऊनचा पहिला आठवडा लहान मुलांकरिता अधिक गोंधळाचा होता. खेळायला घराबाहेर जाता न येणे, दैनंदिन वेळापत्रकात झालेला बदल, सध्या आॅनलाईन शिक्षणाचा त्यांच्यावर पडलेला ताण यासगळयाचा विचार करावा लागेल. आता पालकदेखील मोठ्या बिकट परिस्थितीतून जात आहेत. कामावर कसे जायचे हा त्यांच्यापुढील महत्वाचा प्रश्न आहे. मुले खुप संवेदनशील असतात. त्यांना लावलेल्या सवयी आणि सद्यस्थिती याच्याकडे पाहिल्यास त्यांच्या वागण्या बोलण्यातील तफावत जाणून घेता येईल. 

* लॉकडाऊनमध्ये कुटूंबातील संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. यात आई वडिलांमधील वाद हे एक महत्वाचे कारण आहे. सतत एकमेकांसमोर असणे, छोट्या मोठ्या कारणांमधून झालेल्या तक्रारी याचा परिणाम संवादावर झाला आहे. घरातील लहानमुले हे सगळे पाहत आहेत. आत्महत्यामागील मुख्य कारण काय हे शंभर टक्के अचूकरीत्या सांगता येणार नाही. यातील काहींना जुने मानसिक आजार असतात. नैराश्य, व्यसनांच्या आहारी जाणे याचा विचार करावा लागेल. मुल अचानक शांत झाले किंवा त्याने टोकाचे विचार बोलुन दाखवले तर मानसोपचारतज्ञांची मदत घ्यायला हवी.   ‘मी आत्महत्या करणार असे जो बोलून दाखवतो तो आत्महत्या करणार नाही.’ असे म्हणतो तो ते करणार नाही. असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. असे कुणी बोलत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करावा. - डॉ. भुषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ञ 

*  नैराश्यग्रस्तांना समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असणा-या कनेक्टिंग एनजीओकडे लॉकडाऊनच्या काळात दिवसाला 15 ते 18 फोन येत आहेत. महिन्याला 450 पेक्षा जास्त मुले, तरुण आपल्या समस्या या समुपदेशकांकडे मांडत आहेत. यातील वयोगट प्रामुख्याने 14 ते 45 दरम्यानचा आहे. घरगुती भांडणे, आईवडिलांमधील बेबनाव, मुलांना होणारी मारहाण, आर्थिक समस्या, परस्परांमधील संवादाचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याची माहिती संबंधित संस्थेकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस