शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरमधील बांधकामे चुकीची, चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:16 IST

चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत.

पुणे : चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन, द ट्रिब्यून ट्रस्ट, आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज अर्थात सीएएसएस या संस्थांतर्फे आयोजित ‘पुणे डायलॉग आॅन नॅशनल सिक्युरिटी-२०१७’ (पीडीएनएस) या सुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन यशदा येथे करण्यात आले होते. या परिषदेस चीन येथील फुदान विद्यापीठातील ‘इस्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल अफेअर्स’ विभागाचे प्रमुख प्रा. शेन डिंगली यांंनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
डिंगली म्हणाले, चीन पाकव्याप्त काश्मीरच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम केले जात आहे. वास्तविक पाहता या जागा वादातीत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा जागेत काम करणे चुकीचे आहे. मात्र, तरीसुद्धा या ठिकाणी कामे होत आहेत. इंडो पॅसिफिक योजनेद्वारे चीनला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता योजनेद्वारे चीनला काही फरक पडणार नाही.
आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, त्याचबरोबर डोकलामबाबत भूतान व चीनमध्ये पूर्वीपासून वाद आहे. अशा परिस्थितीत चीनने तिथे रस्त्याचे काम करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चीनचा नॉर्थ कोरियाच्या भूमिकेला विरोध आहे. याबाबत वेळोवेळी चीनने त्या देशाला समज दिली आहे. नॉर्थ कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याने आशिया खंडातील परिस्थिती अस्थिर बनली आहे.
- प्रा. शेन डिंगली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर