शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धापरीक्षेत ताण-तणावात मानसिक कणखरता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. एकट्या एमपीएससी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज करत आहेत. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक ताण येत आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यांने गृहीत धरूनच अभ्यास करावा. कारण, केवळ एमपीएससी अथवा यूपीएससी म्हणजे सर्वकाही नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा करियर म्हणून इतर पर्याय वैकल्पिक ठेवणे गरजेचे आहे, असे मत पुण्यातील स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.

स्वप्निल लोणकर या पुण्यातील फुरसुंगी येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक आहे. अभ्यास असो की आर्थिक अडचण किंवा परीक्षा पुढे ढकलली, तरी खचून न जाता मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ताण- तणावाच्या काळात समुपदेशन (कौन्सिलिंग) करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये, असे मत काही संस्थाचालकांनी व्यक्त केले.

---

स्पर्धापरीक्षेच्या जागा आता दर वर्षी कमी होत आहेत. जागा कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे प्रचंड स्पर्धा निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने एमपीएससी, यूपीएससी व्यतिरिक्त इतर पर्याय तयार केले पाहिजे. नैराश्य आले तर संकोच न करता चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर अर्धवेळ नोकरी करूनही अभ्यास करता येऊ शकतो. त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

- निखिल नानगुडे, खासगी संस्थाचालक

----

काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानाही स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी पुण्या-मुंबईकडे किंवा इतर मोठ्या शहरात येतात. वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांने तसे नियोजन करावे. अन्यथा, विनाकारण मग विद्यार्थी या चक्रव्यूहात अडकून पडतो. इतर वैकल्पिक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडणे गरजेचे आहे.

- आय. पी. सिंह, खासगी संस्थाचालक

-----

स्पर्धापरीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी चांगले मित्र करायला हवेत. कारण अडचणीत, ताण-तणावाच्या वेळी आणि अभ्यास करतानाही खूप मोलाची ठरते. त्यामुळे आलेले नैराश्य देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना फायदा होईलच. तसेच यशाची टक्केवारीही वाढेल.

- सचिन हिसवणकर, खासगी, संस्थाचालक

----

कोट

यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने देखील परीक्षांचे वेळापत्रक राबवणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करून भागणार नाही. एका वर्षात पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पाळली गेली तर विद्यार्थी यशस्वी होऊन लवकर बाहेर पडू शकतो. अन्यथा, या चक्रव्यूहात अडकून वय, पैसा, वेळ आणि शिक्षण या सर्व गोष्टी वाया जाईल.

- शिवाजी इंगवले, विद्यार्थी