शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हरवला चिमण्यांचा निवारा

By admin | Updated: March 19, 2015 22:54 IST

काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे.

बारामती : काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या संदेशाची शुक्रवारी (दि.२० ) असलेल्या चिमणी दिनाच्या निमित्ताने पुन्हा आठवण झाली आहे.अगदी दशकभरापूर्वी चिमणी हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच होता. मात्र आता वाढते शहरीकरण, प्रदूषण, सिमेंट-क्राँक्रिटीकरणामध्ये या चिमण्या तग धरू शकत नाही. त्यांचे प्रमाण शहरी भागात बरेच कमी झाले आहे. यामुळेच ‘ गेल्या चिमण्या कुणीकडे ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ चिमण्यांच्या गरजा तशा फारच कमी असतात. त्यांना हवी असते फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा़ कधी मग ती फोटोच्या पाठीमागे, भिंतीच्या फटीत, दरवाजाच्यावर किंवा जिथे जागा मिळेल तिथे ही चिमणी राहते. कधी विहिरीमधील छिद्रांमध्येही ती तिचा आसरा शोधते. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात या चिमण्यांना उपलब्ध असलेली माळवदाची घरे किंवा रामकाटी बाभळींचे प्रमाण कमी झाले आहे. चिमण्या सर्वांत जास्त संख्येने राहात असलेल्या रामकाटी बाभळींची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र आहे.आजच्या घरबांधणी पद्धतीत बिचाऱ्या चिमणीला जागाच नाही. अंगण नाही, अंगणात दाणा नाही, बाग आहे; पण अळ्या वा कीड नाही. असलीच तर ती कीटकनाशकांच्या प्रादुभार्वाने दूषित. हवेतही वाहनांच्या धुराचे प्रदूषण! मग चिमणी राहणार कुठे? शहरात राहीलच कशासाठी? हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवासच नष्ट होत चालल्याने चिमण्या स्थलांतरित होत चालल्या आहेत.आता उन्हाळा सुरू झाला आहे. या बरोबरच सर्वांनी फार काही नाही पण एक वाटी पाणी पिण्यासाठी ठेवू शकतो. या एक वाटी पाण्याने जर आपण चिमण्यांची तहान भागवू शकला तर खऱ्या अर्थाने चिमणी दिन साजरा करण्यात येईल, असे मत बारामतीतील निसर्गप्रेमी फै य्याज शेख यांनी व्यक्त केले.मागील २० ते ३० वर्षांत चिमण्यांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. चिमणी नेहमी सुरक्षित आसरा शोधत असते. तिचा नैसर्गिक अधिवास असलेल्या काटेरी झाडांची संख्या कमी होत चालल्याने चिमण्यांचा निवारा हरवतोय. या वाढत्या शहरीकरणामध्ये चिमण्यांना राहायलाच जागा नसल्याने त्यांची संख्या घटत चालली असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे महत्त्वाचे आहे़ - डॉ. महेश गायकवाड, निसर्गतज्ज्ञ