शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

HSC Exam Result 2025: महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:39 IST

वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे

उद्धव धुमाळे 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल साेमवारी (दि. ५) जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. सर्वात कमी अर्थात तळामध्ये लातूर विभागाचा नंबर लागला असून, ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षी पेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे यंदाच्याही निकालाने स्पष्ट झाले आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. विशेष करून कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी कमी झाला आहे.

लातूर पॅटर्न नापास 

राज्यात कधी काळी लातूर पॅटर्न मोठया प्रमाणावर चर्चेत आला होता. त्याचे निकालही उत्तम प्रकारे आले होते.  मात्र, मागील काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात घट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसरीकडे लातूरमध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट

बारावी परीक्षेला नाेंदणी एकूण - १४ लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट झाली  आहे. मागील वर्षी ९३.३७ टक्के निकाल लागला होता. 

विभागनिहाय टक्का - यंदा - गतवर्षी

पुणे -- ९१.३२ -- ९४.४४नागपूर -- ९०.५२ -- ९२.१२छत्रपती संभाजीनगर -- ९२.२४ -- ९४.८०मुंबई -- ९२.९३ -- ९१.९५कोल्हापूर -- ९३.६४ -- ९४.२४अमरावती -- ९१.४३ -- ९३नाशिक -- ९१.३१ -- ९४.७१लातूर -- ८९.४६ -- ९२.३६कोकण -- ९६.७४ -- ९७.९१

शाखानिहाय निकाल - यंदा - गतवर्षी

विज्ञान --९७.३५ -- ९७.८२वाणिज्य -- ९२.६८ -- ९२.१८व्यवसाय -- ८३.२६ -- ८७.७५कला -- ८०.५२ -- ८५.८८

शंभरटक्के निकाल लागलेले काॅलेज

यंदा - १,९२९गतवर्षी - २,२४६

निकाल शून्यटक्के लागलेले काॅलेज

यंदा - ३८गतवर्षी - २१

गुणवत्तेचा तक्ता 

९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी - ८३५२८५ ते ९० टक्के - २२,३१७८० ते ८५ टक्के -४६,३३६७५ ते ८० टक्के - ७४,१७२७० ते ७५ टक्के - १,०३,०७०६५ ते ७० टक्के - १,३१,८१२६० ते ६५ टक्के - १.८१,७५५४५ ते ६० टक्के - ६,००,२२७

उत्तीर्ण हाेणाऱ्या प्रमाण

मुली- यंदा - ६,२५,९०१ (९४.५८ टक्के) मुलांपेक्षा ५.०७ टक्के जास्त

दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

यंदा - ६,७०५ (९२.३८ टक्के)गतवर्षी - ६,५८१ (९४.२० टक्के)

काॅपी प्रकरणे किती?

यंदा - ३६४गतवर्षी - ३१३

१४७ विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी, विविध कारणांनी १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर येथील १३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या खालाेखाल पुणे ६, लातूर २, काेल्हापूर १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रlaturलातूर