शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

खेड तालुक्यातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ ; तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 1:15 PM

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देचासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून धरणातून आरळा नदीत तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आरळा नदीतून चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाकडून  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झाली आहे. पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे खालच्या भागात असलेल्या चासकमान धरणामधील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

चासकमानधरणातही १ टी.म.सी पाण्याची वाढ झाली असून, भामा आसखेड धरणही ५० टक्के भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. दरवाजा विरहीत असलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून सध्या प्रती सेकंद तीन हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी आरला नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे.

आरळा नदीत सोडलेल्या पाण्याचा चासकमान धरणात संचय होतो. तसेच गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसKhedखेडDamधरणWaterपाणी