शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 03:00 IST

पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी : कामगार आयुक्तांकडे मागितली जातेय दाद

सुनील गाडेकर

पुणे : प्रोजेक्टची संख्या कमी झाल्याने नफा कमी होवू लागल्याने आयटी क्षेत्रातील अनेक कपंन्या मोठा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचा अजब प्रकार संध्या सुरू आहे. सुटीची गरज नसताना १० ते १५ दिवस घरी थांबावे लागत असल्याने आयटीयन्स हैराण झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत हिंजवडी, औध, बाणेर, बालेवाडी, विमाननगर कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. परदेशात एखादा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळ याची तुलना केली असता भारतात तो त्वरित व कमी पैशात तयार केला जात असल्याने अनेक परदेशी कंपन्या त्यांची कामे पुणे आणि बंगळुरूमध्ये असलेल्या आयटी कंपन्यांना देत असतात. त्यामुळे परदेशी कंपन्याकडून प्रोजेक्ट मिळवून त्यावर काम करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या पुण्यात कार्यरत आहेत. मात्र डिसेंबरमध्ये नाताळाच्या सुट्यांमुळे अनेक कंपन्यांना अपेक्षित प्रोजेक्ट न मिळाल्याने कर्मचाºयांना काय काम द्यायचे, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे कर्मचाºयांवरील खर्च कमी करण्यासाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जात आहे. संबंधित सुटीच्या दिवसांचा पगार कर्मचाºयांना दिला जातो. पण गरज नसताना सुटी घ्यावी लागत असल्याने कर्मचाºयांमध्ये रोष निर्माण होताना दिसतो आहे.या प्रकाराबाबत शहरातील एका बड्या कंपनीतील काही कर्मचाºयांनी कामगार आयुक प्रशासनाकडे तक्रारदेखील केली आहे. त्यांना डिसेंबर महिन्यात १५ दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना बोलावून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तालयाकडूनस्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान सक्तीने रजा देण्याचे प्रकार वर्षभर सुरू असतात. मात्र, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सर्वाधिक कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठविलेले जातात. आयटी कंपन्यांमधील अनेक कामे ही परदेशातून आलेले असतात. डिसेंबरमध्ये नाताळाच्या निमित्ताने परदेशातील कंपन्यांना सुमारे २० दिवस सुटी असते. त्यामुळे त्या काळात त्यांच्याकडून कोणतेच प्रोजेक्ट पाठविले जात नाहीत, अशी माहिती फोरम फॉर आयटी एम्लोयीचे राज्य अध्यक्ष पवनजित माने यांनी दिली.... तर पुढील वर्षाच्या सुट्या घ्याडिसेंबर अखेरीस अनेकांच्या सुट्या संपलेल्या असतात. त्यामुळे सक्तीच्या सुट्या घेत असताना त्याचा पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून करण्यात येते.त्यामुळे त्यांना पुढील वर्षीच्या सुट्या वापरण्याची मुभा दिले जाते. तसेच सक्तीच्या सुट्या आपोआप प्रत्येकाच्या सिस्टीमला अपलोड केल्या जातात. त्यामुळे इच्छा नसली तर सुट्या घ्याव्याच लागतात.जानेवारीत भरती... कायम असलेल्या कर्मचाºयांना सक्तीच्या सुटीवर तर कंत्राटी पद्धतीने घेतलेल्यांना कायमचेच घरी पाठविले जाते. कायम कर्मचारºयांना सुटीचे पैसे देणे कंपनीला बंधनकारक असते. मात्र, कंत्राटी मुलांना तशी सुविधा मिळत नाही. त्यामुळे पुरेसे काम नसेल तेव्हा कंत्राटी कर्मचाºयांना थेट कामावरून काढून टाकले जाते. त्यानंतर जानेवारीत गरज असेल तेव्हा पुन्हा नवीन मुलांना संधी दिली जाते.बिल न आल्याचे कारणपरदेशी कंपनी एखादा प्रोजेक्ट देताना त्यासाठी काम करणाºयांना प्रतितास किती पैसे द्यायचे, हे आधीच ठरवतात.परदेशी कंपनी सुमारे १५ ते २० डॉलर प्रतितास या पद्धतीने पैसे देते. मात्र, येथील कंपन्या कर्मचाºयांना प्रतितास ५ डॉलरप्रमाणे पैसे देतात.मात्र, सुटी असल्याने कामच झाले नाही. त्यामुळे आपल्या कामाचे अजून बिल आले नाही. बिल न आल्याने पगार देता येत नसल्याचा बहाणा कंपन्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणे