शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 23:19 IST

"दुर्देवाने आपल्या देशात काही लोक धार्मिकतेच्या मुद्द्यावर दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण..."

पुणे: मूलतत्त्ववादी आणि धर्मांध लोक प्रत्येक समाजात असतात; मग तो समाज हिंदू असो वा मुस्लीम. अशा प्रतिगामी विचारधारेच्या मूठभर लोकांमुळे संपूर्ण देशाचे नुकसान होते. अशा लोकांचे मुळीच समर्थन होऊ शकत नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तबलिगींनी ज्या प्रकारे गैरवर्तन केले, त्याचे समर्थन मी मुळीच करणार नाही. पण म्हणून काही वेड्या लोकांच्या चुकीपायी संपूर्ण मुस्लीम समाजाला वेठीस धरणंही चुकीचं आहे.

दुर्देवाने आपल्या देशात काही लोक धार्मिकतेच्या मुद्द्यावर दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यामुळे देश काही उद्ध्वस्त होणार नाही. कारण भारत देशाने अशा अनेक संकटांशी याआधी दोन हात केले आहेत. हा देश बर्‍याचदा हादरला, डगमगला पण मोडला कधीच नाही. आपणही कोरोनाच्या या संकटातून सहीसलामत बाहेर येऊच, असा मला विश्‍वास वाटतो. अशा शब्दांत ख्यातकीर्त गीतकार व साहित्यिक जावेद अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मंजुल पब्लिशिंग हाउसने आयोजित केलेल्या दास्तान-ए-शायरी या इन्स्टाग्राम लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. अरविंद मंडलोइ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जो बात कहने से डरते है सब वो बात तू लिख, ये देश ऐसा नही था यांसारख्या शायरी व नज्म यांनी ही ऑनलाइन मैफल रंगली. भारतभरातून अनेक जण या मैफलीत सामील झाले होते. अख्तर पुढे म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस आपला जीव धोक्यात घालून ही लढाई लढत आहेत; पण काही धर्मांध लोक त्यांच्यावर हल्ला करत आहेत, ही खरंच चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे.

स्वतःवर संकट ओढवल्यावर ज्या मंदिर, मशीदीकडे लोक धावतात, आज त्याच धर्मस्थळांना टाळे लावायची वेळ आली आहे. प्रत्येक देश स्वतःला महासत्ता बनवण्याच्या नादात स्वतःच्या देशातील आरोग्यव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. अद्ययावत शस्त्रात्रे निर्मितीत गुंग झालेला अमेरिकेसारखा बलाढ्य देशही याच चुकीमुळे आज गुडघे टेकू टाकला आहे. तळागाळातल्या लोकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आणि त्यांचा किमान विकास साधण्यात आपला देश आजही अपयशीच ठरला आहे. जिथे निर्भयपणे व्यक्त होता येत नाही, ती लोकशाही सदोष असते आणि अशा यंत्रणेचा फटका नेहमी सर्वसामान्यांनाच बसतो.

भविष्यात आपल्या देशाला अशा आपत्तींसाठी आधीपासूनच तयारी करायला हवी. बेरोजगारी, गरीबी, टोकाची विषमता आणि सदोष आरोग्ययंत्रणा अशी अनेक आव्हानं समोर असताना धार्मिक तणावांना बळी पडलो तर आपला देश कित्येक वर्षे मागे जाईल. कोरोनाच्या आपत्तीमुळे कला, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रालाही फटका बसला असून इथून पुढच्या काळात होणार्‍या अभिव्यक्ती व आविष्कारांतही याचं प्रतिबिंब उमटेल असंही ते म्हणाले.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPuneपुणे