शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘नेटा’ने मोबाइलचा वापर तरुणाईसाठी धोकादायक, नैराश्याच्या छायेत युवा पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:56 IST

कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही.

पुणे - कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत सातत्याने गुंग असताना ‘संवाद’ विसरलेल्या यंग बिग्रेडला सध्या नैराश्य या मानसिक व्याधीने त्रस्त केले आहे.प्रत्येकाला ज्याची त्याची स्पेस मिळायला हवी, या नावाखाली तरुणाई मुक्तपणा हवा तसा अनुभवते. परंतु त्या मुक्तपणाबरोबरच येणाºया समस्यांना कसे सामोरे जावे, याविषयी ते कुणाचे मार्गदर्शन घेत नाही. त्यांना तसे सांगायला गेल्यास आवडत नसल्याची ओरड पालकांची असते. वय वर्षे १५ ते ३० या कालावधीतील युवा पिढीशी संवाद साधायचा झाल्यास मोठी कसरत करावी लागते. त्यांची एकूणच ऐकून घेण्याची मानसिकता कमी झाल्याने काही सांगायचे म्हटले तरी ‘चिडणे’ हा त्यांचा स्वभाव झाल्याचेही पालक सांगतात. कामाचा वाढत जाणारा ताण, तो असह्य झाल्याने व्यसनाचा घेतलेला आधार, व्यसनांच्या आहारी जावून खालावलेले मानसिक आरोग्य यामुळे तरुणाई कमालीच्या नैराश्यात गुंतत चालली आहे. चिंताग्रस्तता, नैराश्य आणि नेट अँडीक्शन यामुळे युवकांच्या सर्जनशील विचारांत अडथळा येत आहेत. शिक्षणानिमित्त खेडेगावातून शहरांत येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गाव सोडून शहरात आल्यानंतर शहराबद्द्लची नवलाई, नवीन माणसे, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून कुतूहल म्हणून अनेक गोष्टी करु पाहण्याच्या भावनेतून तरुण नैराश्यात अडकताना दिसते.दृष्टीपटलावर सतत असणारा मोबाईल आणि कॉम्प्युटर्स यामुळे मंदावलेली विचारक्षमता, व्हाट्सअँपच्या अतिरेकामुळे जाअवर्स संपल्यानंतर त्याचा तरुणाईवर झालेला परिणाम गंभीर असल्याचे तज्ञ सांगतात. वाचनापासून दुरावलेली तरुणाईला वैचारिक खाद्य पुरविणा-या माध्यमांबाबत तरुणाई फारशी जागृत नसल्याचे दिसून आले आहे. काही अंशी त्यांचा सहभाग आहे. परंतु तो देखील मर्यादित स्वरुपात असल्याचे पाहवयास मिळते. केवळ तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठांच्या समस्या देखील फार वेगळ्या नाहीत. त्यांना देखील नैराश्याने ग्रासलेले आहे. वास्तविक तरुणांना संवादात फारसा रस न उरल्याने घरातील ज्येष्ठांशी ‘‘अबोला’’ तणाव तयार करतो. याचा परिणाम ज्येष्ठांच्या मानसिकतेवर होतो.१८ ते २५ वय वर्ष यात दारू, सिगारेट या व्यसनांविषयीचे आकर्षण ‘‘करून पाहणे’’ या भावनेतून त्या व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण तरुणाईत जास्त दिसते.०९%ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते.१५ ते २९या वयोगटांतनैराश्य व अस्वस्थता वाढत आहे.दैनंदिन जीवनमानात व्यस्तता जास्त आल्याने तरुणांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. साधारण १५ ते २९ या वयोगटांत नैराश्य व अस्वस्थता वाढत आहे. आता डी. एस. एम. (डायग्नोस्टिक अँंड स्टॅटिस्टिकल मॅन्युएल) मध्ये नेट अ‍ॅडिक्शन यामुळे होणाºया मानसिक विकाराचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा वाढता व्याप, त्यामुळे होणारी चिडचिड, अतिरिक्त ताण, त्या ताणाचे रागात होणारे रुपांतर यामुळे मानसिक आरोग्याचे संतुलन बिघडते. केवळ तरुणच नव्हे, तर ९ टक्के ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते. - डॉ. मधुमिता महाले, येरवडा मनोरुग्णालयकाय झाले?पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती होती ती आता संपल्याने एकोप्याची भावना जाऊन एकटेपणा वाढला.तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे गंभीर समस्यानिर्माण झाल्या.कामाचा वाढता ताण, तो सहन न झाल्याने चिडचिडेपणा वाढणेवेळेचे व्यवस्थापन करण्यात येणारे अपयशकाय करता येईल?घरी आनंदी वातावरण कसे राहील याची काळजी घेणे.घरातील सर्व सदस्यांनी संवादात्मक भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाशी बोलल्यास समस्यांवर उत्तरे शोधता येतील.पालक-पाल्य यांच्यात सुसंवाद हवा. पाल्याच्या शंकांचे निरसन करण्यात पालकांनी पुढाकार घ्यावा.

टॅग्स :MobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटHealthआरोग्य