शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

‘नेटा’ने मोबाइलचा वापर तरुणाईसाठी धोकादायक, नैराश्याच्या छायेत युवा पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:56 IST

कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही.

पुणे - कुणाशी काही बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही. मोबाइल हाच मित्र झाल्यामुळे बोलणंच संपलेल्या स्थितीत युवा पिढीतला संयम संपत चालला आहे. दिवसभर डोळ्यासमोर मोबाइल असणाऱ्या तरुणाईला भोवताली काय चालले आहे, याचे भानच नाही. त्याच्याशी काही देणे घेणे नाही. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत सातत्याने गुंग असताना ‘संवाद’ विसरलेल्या यंग बिग्रेडला सध्या नैराश्य या मानसिक व्याधीने त्रस्त केले आहे.प्रत्येकाला ज्याची त्याची स्पेस मिळायला हवी, या नावाखाली तरुणाई मुक्तपणा हवा तसा अनुभवते. परंतु त्या मुक्तपणाबरोबरच येणाºया समस्यांना कसे सामोरे जावे, याविषयी ते कुणाचे मार्गदर्शन घेत नाही. त्यांना तसे सांगायला गेल्यास आवडत नसल्याची ओरड पालकांची असते. वय वर्षे १५ ते ३० या कालावधीतील युवा पिढीशी संवाद साधायचा झाल्यास मोठी कसरत करावी लागते. त्यांची एकूणच ऐकून घेण्याची मानसिकता कमी झाल्याने काही सांगायचे म्हटले तरी ‘चिडणे’ हा त्यांचा स्वभाव झाल्याचेही पालक सांगतात. कामाचा वाढत जाणारा ताण, तो असह्य झाल्याने व्यसनाचा घेतलेला आधार, व्यसनांच्या आहारी जावून खालावलेले मानसिक आरोग्य यामुळे तरुणाई कमालीच्या नैराश्यात गुंतत चालली आहे. चिंताग्रस्तता, नैराश्य आणि नेट अँडीक्शन यामुळे युवकांच्या सर्जनशील विचारांत अडथळा येत आहेत. शिक्षणानिमित्त खेडेगावातून शहरांत येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गाव सोडून शहरात आल्यानंतर शहराबद्द्लची नवलाई, नवीन माणसे, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून कुतूहल म्हणून अनेक गोष्टी करु पाहण्याच्या भावनेतून तरुण नैराश्यात अडकताना दिसते.दृष्टीपटलावर सतत असणारा मोबाईल आणि कॉम्प्युटर्स यामुळे मंदावलेली विचारक्षमता, व्हाट्सअँपच्या अतिरेकामुळे जाअवर्स संपल्यानंतर त्याचा तरुणाईवर झालेला परिणाम गंभीर असल्याचे तज्ञ सांगतात. वाचनापासून दुरावलेली तरुणाईला वैचारिक खाद्य पुरविणा-या माध्यमांबाबत तरुणाई फारशी जागृत नसल्याचे दिसून आले आहे. काही अंशी त्यांचा सहभाग आहे. परंतु तो देखील मर्यादित स्वरुपात असल्याचे पाहवयास मिळते. केवळ तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठांच्या समस्या देखील फार वेगळ्या नाहीत. त्यांना देखील नैराश्याने ग्रासलेले आहे. वास्तविक तरुणांना संवादात फारसा रस न उरल्याने घरातील ज्येष्ठांशी ‘‘अबोला’’ तणाव तयार करतो. याचा परिणाम ज्येष्ठांच्या मानसिकतेवर होतो.१८ ते २५ वय वर्ष यात दारू, सिगारेट या व्यसनांविषयीचे आकर्षण ‘‘करून पाहणे’’ या भावनेतून त्या व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण तरुणाईत जास्त दिसते.०९%ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते.१५ ते २९या वयोगटांतनैराश्य व अस्वस्थता वाढत आहे.दैनंदिन जीवनमानात व्यस्तता जास्त आल्याने तरुणांमध्ये नैराश्य वाढल्याचे दिसून येते. साधारण १५ ते २९ या वयोगटांत नैराश्य व अस्वस्थता वाढत आहे. आता डी. एस. एम. (डायग्नोस्टिक अँंड स्टॅटिस्टिकल मॅन्युएल) मध्ये नेट अ‍ॅडिक्शन यामुळे होणाºया मानसिक विकाराचा समावेश करण्यात आला आहे. कामाचा वाढता व्याप, त्यामुळे होणारी चिडचिड, अतिरिक्त ताण, त्या ताणाचे रागात होणारे रुपांतर यामुळे मानसिक आरोग्याचे संतुलन बिघडते. केवळ तरुणच नव्हे, तर ९ टक्के ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिसून येते. - डॉ. मधुमिता महाले, येरवडा मनोरुग्णालयकाय झाले?पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती होती ती आता संपल्याने एकोप्याची भावना जाऊन एकटेपणा वाढला.तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे गंभीर समस्यानिर्माण झाल्या.कामाचा वाढता ताण, तो सहन न झाल्याने चिडचिडेपणा वाढणेवेळेचे व्यवस्थापन करण्यात येणारे अपयशकाय करता येईल?घरी आनंदी वातावरण कसे राहील याची काळजी घेणे.घरातील सर्व सदस्यांनी संवादात्मक भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाशी बोलल्यास समस्यांवर उत्तरे शोधता येतील.पालक-पाल्य यांच्यात सुसंवाद हवा. पाल्याच्या शंकांचे निरसन करण्यात पालकांनी पुढाकार घ्यावा.

टॅग्स :MobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटHealthआरोग्य