शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:39 IST

भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला विरोध वाढत असून, आमरण उपोषणाच्या हत्यारानंतर आता पुण्यातील ४० अंशाच्या तापमानात, तसेच रखरखीत उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश काढण्यात आला. यातून शेतकऱ्यांनी विरोध आणखी तीव्र केला असून, विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतांवरूनच होईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येणार आहे. याविरोधात सात गावांतील शेतकऱ्यांनी, तसेच नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह भर उन्हात सोमवारी (दि. २८) अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा आक्रोश मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे सभेत रूपांतर झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, विमानतळ होऊ देणार नाहीच, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.

या वेळी कोळसे म्हणाले, पुरंदर विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल. शेतकरी विमानतळाला जमीन देणार नाहीत, हा आमचा निर्धार आहे. हा निर्धार पक्का असून, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या विमानतळामुळे हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार आहेत. जिल्ह्यात अनेक जागा उपलब्ध असून, तिथे विमानतळ करावे. या गावात जाऊन येथील परिस्थिती पाहिली आहे. एक - एक रुपया गोळा करून संसार उभा केला आहे. लांबून पाणी आणले आहे. हे सगळे बरबाद करायला निघाले आहेत. यातून अनेक संसार बुडणार आहेत. मात्र, याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. विमानतळ अडविणारच. राज्य सरकारने विरोधकांचे अस्तित्व नाकारणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे.ज्यांच्यासाठी विमानतळ बांधण्यात येत आहे, त्यांनी काय त्याग केला, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ज्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांचा या विमानतळासाठी बळी का दिला जात आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले.

राज्य सरकार बळजबरीने विमानतळ लादत आहे. घटनेच्या ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार सातही गावातील ग्रामपंचायंतीचा विमानतळास विरोध असल्याचा ठराव मंजूर करण्यात आले आहे. मात्र, सरकार याचा विचार करत नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. या विमानतळामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. पुढच्या पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शेतकरी मानसिक दबावाखाली आहेत.

ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. यामुळे येथील संस्कृती, भौगोलिक स्थिती आणि पर्यावरण नष्ट होणार आहे. सरकार केवळ पैसा देण्याचा विचार करत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या जीविताचा विचार करत नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याऐवजी त्यांना पीडा देण्याचे काम सरकार करत आहे. त्याला वाचा फोडावी, म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हा तालुका नष्ट करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत व्हावे. विमानतळाचे भूत लाथाडायचे आहे. केवळ मोबदला देऊन चालणार नाही. आमचे अस्तित्वच नष्ट होणार आहे. - मंजुषा गायकवाड, सरपंच, कुंभारवळण

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनPurandarपुरंदरAirportविमानतळcollectorजिल्हाधिकारीairplaneविमानMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार