जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:14 IST2025-06-21T11:13:29+5:302025-06-21T11:14:07+5:30
जर कोणी मुजोरी, अरेरावी, उद्धटपणे वर्तन करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत

जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण
पुणे: आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. त्यांच्या या वाईट वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनीसुद्धा दाखल घेतली आहे. जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्यावेळीच समज देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
देखणे म्हणाले, जो काही प्रकार घडला आम्ही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे, यात आधारवंत असतो आम्ही शिकलेलो असतो. पण जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत. काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आम्ही बैठक घेतली, त्यानंतर दिलगिरी व्यक्त करणारी आम्ही आता ही एक बैठक घेणार आहोत. त्या बैठकीत मीडियातील हे बांधव वारीचं हे वैभव दाखवण्यात आम्हाला मदत करत असतात. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नेमकं काय घडलं या प्रकार घडला याच आम्ही चिंतन केलं आणि आजही करणार आहोत. योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आम्हाला नाही याची वेगळी व्यवस्था असते.
नेमकं काय घडलं?
आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर कासेकर हे उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक, वारकरी तेथे उपस्थित असतात. पोलिसांना याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते. परंतु कासेकर यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसते आहे.
आम्ही संबंधितांशी चर्चा करू
पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दखल घेतली आहे. पालखी सोहळा आनंद, उत्साह, शांतता अन् आनंद देणारा सोहळा आहे. अशा घटना अजिबात घडू नये. आम्ही संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करू. असं इथून पुढे होणार नाही याचीही काळजी घेण्यास सांगू असं ते म्हणाले आहेत.