शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वदूर पावसाची जोरदार बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी (दि. १६) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी (दि. १६) सायंकाळपासून पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. हर्णे, राजापूर, गगनबावडा, कोयना, महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी गेल्या २४ तासांत हर्णे, राजापूर २००, चिपळूण १७०, वैभववाडी १६०, कणकवली, खेड, वाल्पोई १५०, कुडाळ, लांजा, मुळदे, पेडणे १३०, संगमेश्वर, देवरुख ११०, माणगाव, मुंबई, मुरुड, श्रीवर्धन १००, देवगड, म्हापसा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वेंगुर्ला येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली होती.

मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा २८०, महाबळेश्वर २१०, आजरा १८०, राधानगरी १७०, चांदगड १६०, गडहिंग्लज, कराड, कोल्हापूर, सांगली ९०, शाहुवाडी, यावल ७०, वेल्हे ६० मिमी पाऊस झाला.

मराठवाड्यातील सोयेगाव ६०, औंधा नागनाथ, भूम, कळंब, मुदखेड, शिरूर कासार, सोनपेठ, वाशी ३० मिमी पाऊस पडला.

विदर्भातील अकोला ४०, चिखली ३० मिमी पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.

घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) २३०, डुंगरवाडी, ताम्हिणी ११०, धारावी १००, दावडी ८०, कोयना (नवजा), खंद, भिवपूरी, भिरा ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १२, लोहगाव ८, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ६६, सांगली १२, सातारा ५०, मुंबई १६, सांताक्रूझ ५८, अलिबाग ५, रत्नागिरी २०, पणजी ६, डहाणू ८५, परभणी १४, अमरावती २ आणि नागपूर येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी १८ जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून या तीनही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.