शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी वसुलीने ग्रामपंचायत मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रामपंचायतींची कराची रक्कम अनेकांनी थकीत ठेवली होती. ग्रामपंचायतींकडे पैसे नसल्यामुळे कार्यालयाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, पथदिव्यांची बिले भरणे कठीण झाले होते. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागातर्फे शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २२ हजार ७६६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवसांत वसुली झाल्याने ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे अनेकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली नाही. ग्रामस्थांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला पैशांची आवश्यकता असते. कामगारांचे पगार, पाईपलाईन फुटणे, पथदिव्यांचे वीजबिल भरणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. काही ग्रामस्थांना अनेक वर्षे नोटीस देऊनही ते घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायतींनी न्यायालयात धाव घेतली होती. थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवून शनिवारी (दि. २५) राष्ट्रीय लोकअदालत न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण जिल्ह्यात लोकअदालत न्यायालयामध्ये ही प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात जवळपास ६५ हजार १२५ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यातत आले होते. तर ४७ कोटी ६२ लाख ८२ हजार २९२ रुपयांच्या वसूलीचे उद्दीष्ट ग्रामपंचायत विभागाचे होते. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवत अनेक प्रकरणे निकाली काढले. यात प्रशासनाला १५ कोटी ७९ लाख ७९ हजार १६७ रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.

चौकट

सर्वाधिक वसुली शिरूर, खेड, मुळशी तालुक्यात

जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीत सर्वाधिक वसुली शिरुर, खेड, मुळशी तालुक्यातून झाली. शिरूर तालुक्यातून ५ कोटी ११ लाख ३९ हजार ३०६ वसूल करण्यात आले. खेड तालुक्यात ३ कोटी ५ लाख ६८ हजार ३० वसूल करण्यात आले. तर मुळशी तालुक्यातून २ कोटी २९ लाख ५३ हजार ९ रुपयांची वसूली करण्यात आली आहे.

कोट

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांनी ग्रामपंचायतीचे कर भरले नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली होती. ती भरण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत थकीत कर भरले. लोकअदालतीतही अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली. पुढच्या वर्षीही या प्रकारच्या लोकअदालतीच्या आयोजन करून करवसुली केली जाणार आहे.

- सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

चौकट

रस्ते नाही, पाणी नाही मग आम्ही कर का भरायचा?

आमच्या गावात रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. काही ठिकाणी वीजही नाही. गावात जर पायाभूत सुविधाच नसतील तर आम्ही कर का भरायचा असा सवाल अनेक ग्रामस्थांनी लोक अदालतीत केला. मात्र, सेवा शुल्क नसून ग्रामपंचायतींचा कर आहे. तो भरणे गरजेचे आहे, असे सांगून नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.