शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण सुनावणी रद्द करण्याचा सरकारचा डाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सर्वच विभागातील भरती प्रक्रिया रखडली आहे. महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सर्वच विभागातील भरती प्रक्रिया रखडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची-एमपीएससी ९ सप्टेंबर २०१९च्या आधी झालेल्या परीक्षेत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे. त्यापैकी एसईबीसी सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास अंतर्गत प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र याची माहिती राज्य सरकरलाच नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नेमका कोण खेळ खेळतंय? अशी खेळी करून मराठा आरक्षणावर सुरू असलेली सुनावणी संपविण्याचा राज्य सरकारचा डाव तर नाही ना? असा गंभीर सवाल अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थित केला आहे.

एमपीएससीने राज्य सरकारला अंधारात ठेऊन याचिका दाखल केली हे धक्कादायक आहे.? मराठा आरक्षणामुळे रखलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. तसेच अनेक गरीब उमेदवार असून नोकरी मिळेल या आशेवर आहेत. मात्र एमपीएससीने ही याचिका कोणाच्या सांगण्यावरून दाखल केली हे अजूनही अंधरातच आहे.? यामागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती आहे.? एमपीएससी ही स्वायत्त संस्था असली तरी तिला असा निर्णय घेता येतो का.? असे असे गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकार आणि एमपीएससी यांच्यातील विसंवादामुळे मराठा आरक्षणावर सुरू असलेली लढाई संपवायची आहे.? असेच दिसून येत आहे.? असा आरोप कोंढरे यांनी राज्य सरकारवर केला आहे.?

चौकट

तर ६२०० यशस्वी उमेदवारांना याचा फटका बसणार

जर एमपीएससीच्या मागणी नुसार न्यायालयाने निर्णय दिला तर सुमारे ६२०० यशस्वी उमेदवारांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. जर राज्य सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांची नियुक्ती रद्द केली नाही तर यात राज्य सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होईल, असे कोंढरे म्हणाले.