शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गौतम नवलाखा हे देशद्रोहीच : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:23 IST

तोपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये..

ठळक मुद्देनवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरीम संरक्षण 11 नोव्हेंबर रोजी संपणार

पुणे : माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या कारवाया देशासाठी घातक आहे. त्यामुळे गौतम नवलाखा हे देशद्रोही असल्याचा युक्तिवाद गुरुवारी जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला.

संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यांनी हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी संपर्क साधून देशाचे किती नुकसान केले?, माओवादी संघटनेत किती विद्यार्थ्यांची भरती केली आहे? संघटनेसाठी पैसा कसा उभा केला याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयात सांगितले.

नवलाखा यांचे विविध पत्रांमध्ये नाव असले तरी त्यांचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. सत्यशोधन समितीबाबत त्यांनी केलेली काम हे कायदेशीर आहेत. गेल्या वर्षभरात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रागिणी आहुजा यांनी केला.


तोपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये 
नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरीम संरक्षण 11 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल 12 नोव्हेंबरला होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निकाल होईपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसElgar morchaएल्गार मोर्चा