शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील जंगलाचे वणवे रोखण्यासाठी ‘वन वणवा’ परिषद घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन वणवा परिषदेचे आयोजन केले आहे. वन विभागाकडून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन अशा यंत्रणांतील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे. दरम्यान लोकसहभागाशिवाय वणवे रोखणे कठीण असल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

पंधरवड्यापूर्वी कात्रज घाट परिसरात मोठी आग लागली होती. ज्या भागात आग भडकली होती. ते क्षेत्र पीएमआरडीएच्या अखत्यारीत होते. पुणे शहरालगत टेकड्या आहेत. टेकड्यांवर आग लागण्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा मानवी चुकांमुळे आग लागते. आगीत अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती तसेच वृक्षांना झळ पोहोचते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या विचाराने वनविभागाकडून वनवणवा परिषदेचे आयोजन केले असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.

वन वणवा परिषदेच्या निमित्ताने, महसूल, महापालिका, पीएमआरडीए तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी एकत्र येऊन उपाययोजना करणार आहेत. शहरी भागातील टेकड्यांवर आग लागल्यास टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक वन विभागाला माहिती कळवितात. वनविभागातील एका रक्षकाकडे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र असते. त्याला दोन मदतनीस साहाय्य करतात. टेकडीवर फिरायला येणारे नागरिक वनविभागातील अधिकारी आणि रक्षकांच्या संपर्कात असतात. नियमित फिरायला येणा-या नागरिकांनी समाजमाध्यमावर गट स्थापन केले असून त्याद्वारे आम्हाला माहिती कळविण्यात येते. वनविभागाचा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.

शहरात टेकडीवर येणारे काहीजण जळत्या सिगारेटची थोटके टाकतात. काहीजण वनविभागाच्या जागेपासून काही अंतरावर शेकोटी पेटवतात. वनविभागाच्या जगतात चूल पेटवून जेवण केले जाते. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. पुणे जिल्ह्यत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. काही भागात ऊस जमिनीला लागूनच वनविभागाच्या जागा असतात. ऊसतोडणी झाल्यानंतर काही शेतकरी उर्वरित राहिलेल्या भागाला आग लावतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. वन वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असून पुणे-सातारा महामार्गावर लवकरच जागोजागी फलक बसविणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.