शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामकच्या जवानांना ५ वर्षांत एकदाच गणवेश

By admin | Updated: May 11, 2015 06:27 IST

मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत.

पुणे : मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे काळबादेवीसारखी आगीची घटना पुण्यात घडल्यास जवानांच्या जीवितास मुंबईपेक्षा कैकपटीने जास्त मोठा धोका पोहचू शकतो, अशी भावना जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मुंबईमध्ये काळबादेवी येथील एका लाकडी इमारतीला लागलेल्या आगीत दोघा अग्निशामक अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला, मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले. एका इमारतीच्या आगीत एवढ्या मोठया प्रमाणात नुकसान पोहोचल्याने राज्यभरातील जवानांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जवानांशी संवाद साधला असता, त्यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या निकृष्ट साधनांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने दर वर्षी अग्निशामक जवानांना चांगल्या दर्जाचा गणवेश पुरविणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून नागपूरच्या एका ठेकेदारास गणवेश पुरविण्याचा ठेका दिला. अग्निशामक दलामध्ये ५०० पेक्षा जास्त जवान आहेत, त्यांना एकाच वेळी दोन गणवेशाचे संपूर्ण सेट त्याने पुरविणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने शर्ट, पँट त्यानंतर कोट, बुट असा सुटा गणवेश पुरविला. त्यामुळे काही जवानांना शर्ट, पँट मिळाली, तर कोट मिळाला नाही. काही जणांना बूट मिळाले, टोपी मिळाली नाही. हा गणवेश पुरविण्यास त्याने दीड-दोन वर्षांचा कालावधी घेतला. वस्तूत: दर वर्षी गणवेश दिला जाणे आवश्यक असताना गेल्या ५ वर्षांत केवळ एकदाच गणवेश पुरविला आहे. जवानांना हेल्मेट अद्याप पुरविण्यात आलेले नाहीत. दुर्घटनेच्यावेळी अशा अपुऱ्या साधनांनिशी जर आग विझविण्यासाठी गेले, तर नक्कीच त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकेल, अशी भावना जवानांनी व्यक्त केली.फायर एंट्रीसुट अपुरेदुर्घटनेमध्ये फायरएंट्री सुट घातल्याशिवाय जवानांना आत जाता येत नाही, पुणे अग्निशामक दलाकडे केवळ १० ते १३ फायर एंट्रीसुट आहेत. प्रत्येक अग्निशामक केंद्रास एक असे त्याचे वाटप केले आहे. त्याचबरोबर आगीशी सामना करताना आवश्यक असणारे हेल्मेटही पुरविण्यात आलेले नाहीत.ंधोकादायक वाड्यांचा सर्व्हे करणे आवश्यकशहराच्या मध्यवस्तीत अनेक मोडकळीस आलेले जुने वाडे आहेत. बहुतांश वाडे हे लाकडांचे बांधण्यात आले आहेत. या वाड्यांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात आणणे खूपच जिकिरीचे ठरू शकते. शहरातील धोकादायक वाड्यांचा सर्व्हे करून त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. तसेच वाड्यांमधील इलेक्ट्रिक वायरिंग व्यवस्थित आहे ना, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत अग्निशामक जवानांनी व्यक्त केले.