शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:10 IST

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती.

पुणे : महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. पण आता हेच 'माळीण' सामाजिक बांधिलकी जपत तळिये गावाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. 

कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, चिपळूण, पुणे, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून जनावरे वाहून गेली आहेत तर लाखांवर नागरिकांचे स्थलांतरण कऱण्यात आले आहे. महाड तालुक्यातील तळीये गावावर देखील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक कुटुंब जमीनदोस्त झाली. तसेच जवळपास ढिगाऱ्याखालून तब्बल ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून. अद्यापही ३२ नागरिक बेपत्ता आहे येथील नागरिकांवर  या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे. राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील माळीण गावाने आदर्श उभा केला असून तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत दिली आहे.

माळीणच्या नागरिकांनी तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांचा धनादेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे.या पार्श्वभूमीवर माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ''आम्ही तुमचं दुःख जाणतो..'' म्हटले आहे. माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी २५ हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

७ वर्षांपूर्वीच्या 'त्या' काळरात्रीची आठवण ताजी....पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ६ वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांनी तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. 

जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा; तळीये ग्रामस्थांची मागणी तळीये येथे मागील पाच दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आजही पथकांकडून सुरु असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. मात्र यावेळी नागरिकांनी पथकाला जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी केली.याचवेळी आमच्या पुनर्वसनाचा तातडीने विचार करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmahad-acमहाडRainपाऊसfloodपूरAccidentअपघातState Governmentराज्य सरकारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील