शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पसंती ऊस पिकाला

By admin | Updated: July 8, 2015 01:33 IST

सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनगर : सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे. मात्र तरीही शेतकऱ्याची ऊस पिकाकडून इतर पिकाकडे वळण्याची मानसिकता बदलत नाही. सध्या ऊसलागवड हंगाम सुरू आहे. जिल्हयातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवड एक लाख एकरांहूनही जादा होण्याची चिन्हे दिसत आहेत. साखरेचे घसरलेले दर, देशाच्या गरजेपेक्षा दरवर्षी तयार होणारी जादा साखर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी ‘शॉर्ट मार्जीण’मध्ये गेली आहे. साखर कारखान्यांबरोबरच आता ऊसउत्पादक शेतकरी ही शॉर्ट मार्जीणमध्ये गेल्याने ऊस पिक शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे झाले असले आहे. मात्र मजुरांच्या तुटवडयामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकांकडे वळण्याचे नाव घेत नाही. यावर्षी साखर कारखान्यांनी सन २०१५— १६ चा ऊस लागवड हंगाम बुधवार पासून (दि. १ जुलै)जाहीर केला आहे. जिल्हयात सुमारे एक लाख एकरांपेक्षाही जादा ऊस लागवड होण्याची चिन्हे आहेत.एकीकडे ऊसाला दर नाही. तर दुसरीकडे शेतीला होण्याऱ्या खर्चात काही फरक पडला नाही. नांगरट, सरी, ऊसलागवड, व रासायनिक खते आदी चे दर कमी होण्यापेक्षा दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे.तर दूसरीकडे ही ऊसाची एकरी सरासरी पडली आहे. राज्यातील अनेक कारखान्यांची एकरी सरासरी ४० ते ४२ टनाच्या आसपास आहे. त्यामुळे ऊसाला कमी मिळणारा दर लक्षात घेता आता कमी खर्चात ऊसशेती करण्याची गरज आहे. यासाठी योग्य बेणे निवड करणे गरजेचे आहे. हे करत असताना ऊसाचे एकरी टनांची सरासरी कशी वाढेल हे पाहणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील ऊसउत्पादकांना अजून त्यांची ऊसाची एफआरपी मिळाली नाही. त्यामुळे सद्या शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. (वार्ताहर)