शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, वकील, पौराेहित्यकार अन् डॉक्टर, नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:11 IST

पुणे : आज तरुणीदेखील तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत असाच जोडीदार त्यांना हवा ...

पुणे : आज तरुणीदेखील तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत असाच जोडीदार त्यांना हवा आहे. त्यासाठी तडजोड करण्यास त्या तयार नाहीत. भावी जोडीदार हा एकतर एकाच प्रोफेशनल मधला असावा किंवा मल्टिनॅशनल कंपनीत अथवा एखाद्या मोठ्या हुद्यावर काम करणारा असावा. ‘शेतकरी’, ‘वकील’, पौराेहित्यकार’ किंवा ‘डॉक्टर’ नवरा नको रे बाबा! अशा तरुणींच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांमुळे काही तरुणांवर ‘कुणी मुलगी देता का मुलगी?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुलींनी शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने उंबरठा ओलांडल्यानंतर स्वत:चा जोडीदार कसा असावा, हे त्या ठामपणे सांगू लागल्या आहेत. विविध क्षेत्र मुलींनी पादाक्रांत करीत पुरुषी वर्चस्वाला छेद दिला आहे. त्यांच्या भावी जोडादाराबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ग्रामीण भागात राहाणा-या आणि कमी शिक्षण घेतलेल्या मुलींच्या देखील जोडीदाराविषयीच्या संकल्पना अधिक सुस्पष्ट झाल्या आहेत. त्यांना गावापेक्षाही शहरी भागातील तरुणच जोडीदार म्हणून हवा आहे. मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत त्या प्रतीक्षा करायला देखील तयार आहेत. मुली स्वत: कमावत्या झाल्याने मुलींचे लग्न ठरवताना आईवडीलदेखील कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती देखील पाहायला मिळत आहे.

----------------------------------------

या अटी मान्य असतील तरच ‘हो’ म्हणा....

* तरुण उच्चशिक्षित हवा.

* पुण्या-मुंबईत त्याचा स्वत:चा किंवा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट हवा.

* स्वत:च्या जीवनशैलीशी मॅच करणारा असावा.

* शक्यतो एकुलता एक किंवा कोणतीही जबाबदारी नसणारा असावा.

* सासू-सासरे अन् एकत्र कुटुंब पद्धती नकोच.

----------------------------------------------------------------------------

‘इंजिनिअर’च हवा...

बहुतांश मुलींना ‘इंजिनिअर’ आणि मल्टिनॅशनल कंपनीतच काम करणारा जोडीदार हवाय. शहरी भागातील मुलींची एक विशिष्ट जीवनशैली विकसित झाल्याने पुण्या-मुंबईबाहेर जायला मुली तयार नाहीत. ग्रामीण भागात ही जीवनशैली राखणं अवघड होणार असल्याने गावाकडे कितीही प्रॉपर्टी, स्वत:चं घर असलं तरी मुलींची जाण्याची तयारी नसल्याचे विवाह संस्थांकडून सांगण्यात आले.

------------------------

सुशिक्षित कुटुंबांमध्ये विचारांपेक्षा लग्नपत्रिका पाहण्याकडे अधिक कल

‘लग्न’ हे दोन जीवांचे मनोमिलन असते. त्यामुळे वधू-वराचे किती गुण जुळत आहेत त्यावर त्यांचे लग्न यशस्वी होईल की नाही हे ठरते, अशी वधू-वराच्या कुटुंबीयांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात सुशिक्षित कुटुंबांमध्ये दोघांचे विचार किती जुळत आहेत, यापेक्षा देखील दोघांचे ग्रह जुळतात का? मुलगी ज्या घरी जाणार ती वास्तू कशी आहे, हे पाहण्याकडे कुटुंबीयांचा कल वाढला असल्याचे सांगण्यात आले.

----------------

तरुण-तरुणी स्वत: ज्या प्रोफेशनमध्ये आहेत. त्यातलाच जोडीदार त्यांना हवाय. लग्नाचा विचार करताना तरुणी आपली जीवनशैली अधिक कशी उंचावेल, यावरच अधिक भर देत आहेत. पुण्याबाहेरचे स्थळ आले तर ते या शहरापेक्षा अधिक चांगले असायला हवे, याला त्या प्राधान्य देतात. आर्थिक स्थैर्य आणि कुटुंब कसं आहे, याचा देखील विचार होतो. अरेंज मॅरेज करताना समाज, आसपासचे नातेवाईक काय विचार करतील, हे पाहिले जाते. समाजात ‘शेतकरी’ हा फार मानाचा मानला जात नाही. कुटुंब कुणाबरोबर जोडले जात आहे, हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. आपली जीवनशैली कमावली आहे, ती केवळ लग्नासाठी सोडणं तरुणींना मान्य नाही.

- तन्मय कानिटकर, अनुरूप विवाहसंस्था

------------------

तरुणींना वकील, प्राध्यापक, कंडक्टर, पौराेहित्यकार जोडीदार नको आहे. त्यांना प्रतिष्ठित क्षेत्रातील जोडीदार हवा आहे. जोडीदाराचा स्वतंत्र फ्लॅट हवा अशी त्यांची अट आहे. उद्या आमची नोकरी गेली तर किमान आर्थिक स्थैर्य देणारा नवरा हवाय. गावाकडच्या तरुणींना देखील पुण्यातीलच जोडीदार हवाय. काही तरुणींना एकत्र कुटुंबपद्धती हवी आहे. परंतु हे प्रमाण फक्त 20 टक्के इतकेच आहे.

- स्वाती महेंद्र संभूस, स्वाती वधूवर सूचक मंडळ

----------------------------