शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण केंद्रे आली अडचणीत, स्वयंसेवी संस्थांना केंद्र शासनाचा अनुदान देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 23:25 IST

पुणे : गेली ३० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण केंद्र चालविणा-या स्वयंसेवी संस्थांना आता अनुदान देण्यास केंद्र शासनाने नकार दिला आहे. 

पुणे : गेली ३० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण केंद्र चालविणा-या स्वयंसेवी संस्थांना आता अनुदान देण्यास केंद्र शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांची सर्व भिस्त राज्य शासनावर आहे. केंद्र शासनाकडून यापुढे अनुदान मिळू शकणार नसल्याने स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविली जाणारी सर्व कुटुंब कल्याण सेंटर अडचणीत आली असून राज्य शासनाने स्वत:च्या निधीतून शासकीय कर्मचा-यांपर्यंत वेतन व अनुदान द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.कुटुंब कल्याण व आरोग्यविषयक विविध कार्यक्रम शासनाच्या कुटुंब कल्याण केंद्राप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविणा-या केंद्राकडून राबविले जातात. पण गेल्या काही वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील कुटुंब कल्याण केंद्राची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यात केंद्र शासनाने आता स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणा-या कुटुंब कल्याण केंद्राला अनुदान देण्यास नकार दिला. दुसरीकडे राज्य शासनही आपल्याकडे निधी नसल्याचे कारण पुढे करत आहे. त्यामुळे आता ही केंद्र बंद करावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याबाबत ताराचंद हॉस्पिटलमधील कुटुंब कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ, सुहास परचुरे यांनी सांगितले की, ताराचंद हॉस्पिटलमध्ये १९७६ पासून कुटुंब कल्याण केंद्र चालविले जात आहे. या केंद्रांना प्रथम राज्य शासनाकडून निधी मिळतो व केंद्र सरकारकडून नंतर अनुदान मिळते़ शासनाची केंद्रे आणि स्वयंसेवी संस्थांची केंद्रे यांच्या कामकाजात काहीही फरक नाही. स्वयंसेवी संस्थांच्या केंद्रांची वर्षातून दोनदा तपासणी होते़ त्यांना आरोग्य विषयक कामाचे लक्ष्य दिले जाते. त्याच्या ८५ टक्के काम पूर्ण केल्यावरच अनुदान मिळते. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण असा विविध उपक्रम यशस्वी होण्यामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या या केंद्रांचा सिंहाचा वाटा आहे़ असे असतानाही आता केंद्र शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या केंद्रांना अनुदान देण्यास नकार दिला आहे़ त्यामुळे ही सर्व केंद्रे अडचणीत आली आहेत.महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांनी सांगितले की, शासकीय संस्थामधील कामापेक्षा अधिक चांगले काम स्वयंसेवी संस्थांच्या केंद्रांमधील कर्मचारी करीत आहेत़ असे असतानाही आम्हाला अजूनही पाचव्या आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते़ २००४ पासून वेतनात एक रुपयांचीही वाढ नाही़ आम्ही यापुढे फक्त शासकीय कुटुंब कल्याण केंद्रांनाच अनुदान देऊ़ स्वयंसेवी संस्थांना नाही असे पत्र केंद्र शासनाने राज्य शासनाला पाठविले आहे.स्वयंसेवी संस्थांच्या केंद्रामध्ये प्रामुख्याने महिला कर्मचारी काम करीत असून त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे़ राज्य शासनाने स्वत:च्या निधीतून या केंद्रांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन व अनुदान द्यावे, अशी आम्ही मागणी केली असून त्यावर एक महिन्यात निर्णय घ्यावा़ अन्यथा एक महिन्यानंतर आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दीक्षित यांनी दिला आहे़. महाराष्ट्रात पूर्वी स्वयंसेवी संस्थांची ७२ कुटुंब कल्याण केंद्रे होती़ शासनाच्या दुर्लक्षामुळे आता त्यांची संख्या २२ पर्यंत घसरली आहे़ पुण्यातही पूर्वी १४ कुटुंब कल्याण केंद्रे होती़ आता ताराचंद हॉस्पिटल, डॉ़ संगमनेरकर हॉस्पिटल, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे साने गुरुजी हॉस्पिटल आणि पुणे महिला मंडळ अशा चारच ठिकाणी कुटुंब कल्याण केंद्रे उरली आहेत.

टॅग्स :Puneपुणे