शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार

By राजू इनामदार | Updated: February 11, 2025 18:22 IST

अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे

पुणे : कुटुंबातील भांडणावरून न सांगता परदेशात चाललेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेसाठी झालेला सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता सुनील माने यांनी सावंतांवर सरकारची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अन्य राजकीय पक्षांकडूनची सावंत यांच्यावर टीका होत आहे.

सावंत यांचा धाकटा मुलगा घरी न सांगता खासगी विमान घेऊन थेट बँकॉकला निघाला होता. त्यावरून सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून मदत मागितली. मुलाचे अपहरण झाल्याची अफवा तोपर्यंत सगळीकडे पसरली. सरकारी यंत्रणेला वरिष्ठांचे आदेश मिळाल्याने त्यांनी त्वरेने बऱ्याच हालचाली केल्या. त्यात तो मुलगा खासगी विमानाने बँकॉकला चालला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच कायदेशीर गोष्टी करून पोलिसांनी ते विमान परत पुण्यात आणले.

सावंत चांगले सुशिक्षित आहेत. मंत्री होते. अशा व्यक्तीला कुटुंबाचे, कुटुंबातील गोष्टींचे थोडे तरी भान असले पाहिजे, असे मत माने यांनी व्यक्त केले. देशात अनेक मुले बेपत्ता होतात, घरांतून निघून जातात, त्यांची साधी पोलिस फिर्यादही घेतली जात नाही. तपास होत नाही. वर्षानुवर्षे ही मुले बेपत्ताच राहतात. सावंत प्रकरणात मात्र पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्य करण्यासारखी आहे. त्यामुळे हे सरकार सामान्यांसाठी आहे की फक्त पुढारी, राजकारण्यांसाठी, असा प्रश्न पडला असल्याचे माने म्हणाले.

संजय मोरे यांनीही सावंत यांच्यावर टीका केली. घरच्या भांडणांसाठी सरकारला कामाला लावणाऱ्या सावंत यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्या मुलांसाठी झालेला सरकारचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली. सामान्यांच्या मुलाबाळांनाही सरकारने अशीच वागणूक द्यावी, त्यांच्यासाठीही अशीच त्वरित हालचाल करावी असे ते म्हणाले.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, जनतेने पॅनिक बटण दाबले तर साधा पोलिस शिपाईसुद्धा कधी येत नाही. निर्घृण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचा खुनी दोन महिने झाले तरी पोलिसांना सापडत नाही. इथे मात्र माजी मंत्र्यांच्या घरातून फक्त न सांगता गेलेल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस महासंचालकांपर्यंत सगळे कामाला लागतात. लोकशाही व्यवस्थेची यासारखी दुसरी चेष्टा नाही, असे किर्दत म्हणाले.

समाजमाध्यमांवरही तानाजी सावंत अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. खेकड्यांनी धरणाची भिंत कुरतडली म्हणून ती कोसळली असा विनोदी शोध लावणारे, तो कोण हाफकिन आहे, त्याला बोलावून घ्या, असे म्हणणारे हेच ते महान माजी मंत्री वगैरे टीका सावंत यांच्यावर सुरू आहे. मुलांना सांभाळता येत नाही ते सरकार कसे सांभाळणार? असाही प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीPoliceपोलिस