शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार

By राजू इनामदार | Updated: February 11, 2025 18:22 IST

अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे

पुणे : कुटुंबातील भांडणावरून न सांगता परदेशात चाललेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेसाठी झालेला सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता सुनील माने यांनी सावंतांवर सरकारची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अन्य राजकीय पक्षांकडूनची सावंत यांच्यावर टीका होत आहे.

सावंत यांचा धाकटा मुलगा घरी न सांगता खासगी विमान घेऊन थेट बँकॉकला निघाला होता. त्यावरून सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून मदत मागितली. मुलाचे अपहरण झाल्याची अफवा तोपर्यंत सगळीकडे पसरली. सरकारी यंत्रणेला वरिष्ठांचे आदेश मिळाल्याने त्यांनी त्वरेने बऱ्याच हालचाली केल्या. त्यात तो मुलगा खासगी विमानाने बँकॉकला चालला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच कायदेशीर गोष्टी करून पोलिसांनी ते विमान परत पुण्यात आणले.

सावंत चांगले सुशिक्षित आहेत. मंत्री होते. अशा व्यक्तीला कुटुंबाचे, कुटुंबातील गोष्टींचे थोडे तरी भान असले पाहिजे, असे मत माने यांनी व्यक्त केले. देशात अनेक मुले बेपत्ता होतात, घरांतून निघून जातात, त्यांची साधी पोलिस फिर्यादही घेतली जात नाही. तपास होत नाही. वर्षानुवर्षे ही मुले बेपत्ताच राहतात. सावंत प्रकरणात मात्र पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्य करण्यासारखी आहे. त्यामुळे हे सरकार सामान्यांसाठी आहे की फक्त पुढारी, राजकारण्यांसाठी, असा प्रश्न पडला असल्याचे माने म्हणाले.

संजय मोरे यांनीही सावंत यांच्यावर टीका केली. घरच्या भांडणांसाठी सरकारला कामाला लावणाऱ्या सावंत यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्या मुलांसाठी झालेला सरकारचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली. सामान्यांच्या मुलाबाळांनाही सरकारने अशीच वागणूक द्यावी, त्यांच्यासाठीही अशीच त्वरित हालचाल करावी असे ते म्हणाले.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, जनतेने पॅनिक बटण दाबले तर साधा पोलिस शिपाईसुद्धा कधी येत नाही. निर्घृण हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचा खुनी दोन महिने झाले तरी पोलिसांना सापडत नाही. इथे मात्र माजी मंत्र्यांच्या घरातून फक्त न सांगता गेलेल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस महासंचालकांपर्यंत सगळे कामाला लागतात. लोकशाही व्यवस्थेची यासारखी दुसरी चेष्टा नाही, असे किर्दत म्हणाले.

समाजमाध्यमांवरही तानाजी सावंत अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. खेकड्यांनी धरणाची भिंत कुरतडली म्हणून ती कोसळली असा विनोदी शोध लावणारे, तो कोण हाफकिन आहे, त्याला बोलावून घ्या, असे म्हणणारे हेच ते महान माजी मंत्री वगैरे टीका सावंत यांच्यावर सुरू आहे. मुलांना सांभाळता येत नाही ते सरकार कसे सांभाळणार? असाही प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीPoliceपोलिस