शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

कुणी व्यंगात्मक बोलले, तरी दम भरला जातोय! आम्ही अस्वस्थपणे बघत राहणार का? डॉ. बाबा आढावांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:29 IST

भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण, कुणी व्यंगात्मक बोलले तरी दम भरला जातोय. आम्ही केवळ हे अस्वस्थपणे बघत राहणार आहोत का, आता भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली आहे, असे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले. माणसाची वृत्ती ही विचार व बदल घडविण्याची आहे. पण माणसांना मारायचा प्रकार चालू आहे. लोकशाही नैतिक मूल्यांची बूज राखायला हवी याचे भान सुटले आहे, असेही ते म्हणाले.

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे भाई वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना देण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, फाउंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी विचार मांडले. सत्कारमूर्ती डॉ. तारा भवाळकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. समाजवादी विचार ही एक जीवनसरणी आहे. ती नुसती राजकीय विचारधारा नसून, तो एक जीवन प्रवाह आहे, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्माचा आधार घेतात आणि हे फक्त भारतातच नाही, तर जगामधल्या अनेक देशांमध्ये आता हा एक प्रवाह येतो आहे, असे आपल्याला दिसून येईल. धर्माच्या पाठीमागे लोक जातात आणि धार्मिक गोष्टींच्या मागे जातात असे म्हटले की, बाकीच्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होते, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावCentral Governmentकेंद्र सरकारMahayutiमहायुतीPoliticsराजकारणIndiaभारतBJPभाजपा