शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कुणी व्यंगात्मक बोलले, तरी दम भरला जातोय! आम्ही अस्वस्थपणे बघत राहणार का? डॉ. बाबा आढावांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:29 IST

भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण, कुणी व्यंगात्मक बोलले तरी दम भरला जातोय. आम्ही केवळ हे अस्वस्थपणे बघत राहणार आहोत का, आता भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली आहे, असे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले. माणसाची वृत्ती ही विचार व बदल घडविण्याची आहे. पण माणसांना मारायचा प्रकार चालू आहे. लोकशाही नैतिक मूल्यांची बूज राखायला हवी याचे भान सुटले आहे, असेही ते म्हणाले.

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे भाई वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना देण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, फाउंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी विचार मांडले. सत्कारमूर्ती डॉ. तारा भवाळकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. समाजवादी विचार ही एक जीवनसरणी आहे. ती नुसती राजकीय विचारधारा नसून, तो एक जीवन प्रवाह आहे, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्माचा आधार घेतात आणि हे फक्त भारतातच नाही, तर जगामधल्या अनेक देशांमध्ये आता हा एक प्रवाह येतो आहे, असे आपल्याला दिसून येईल. धर्माच्या पाठीमागे लोक जातात आणि धार्मिक गोष्टींच्या मागे जातात असे म्हटले की, बाकीच्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होते, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावCentral Governmentकेंद्र सरकारMahayutiमहायुतीPoliticsराजकारणIndiaभारतBJPभाजपा