शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जुन्नरचा पूर्व भाग पाण्याअभावी तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:37 IST

चाऱ्यासाठी जनावरांची वणवण; आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या गावांत पाणीटंचाई

आणे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पठारावर असलेल्या आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या चारही गावांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून शेतकऱ्यांवर जनावरांसाठी पाणी व चाºयासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या या चारही गावांत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने आक्टोबरपासूनच पिण्याच्या पाणीटंचाई भासू लागली आहे. शिंदेवाडी व पेमदरा परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.आणे गावठाण हद्दीत बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी येते; परंतु तेही कधी दिवसाआड, तर कधी दोन दिवसांनी मिळते. इतर वस्त्यांसाठी १० हजार लिटरचा एक टँकर असून त्याच्या दररोज फक्त दोनच फेºया होतात. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी नोंदविल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळते. तेही वस्त्यांवरील विहिरीत सोडल्यावर पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्यासाठी जार विकत घ्यावे लागतात.आणे गावाच्या हद्दीत सहा पाझर तलाव आहे. शिवाय, ओढ्यावर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु, या वर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने सर्व तलाव व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे या वर्षी पिके तर नाहीतच; पण जनावरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पठारावरील अनेक शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय असून हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे; परंतु जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकºयांवर आपली दुभती जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. आणे पठारावर चारही गावांमध्ये पशुवैद्यकीय अहवालानुसार ६,७२६ इतके पशुधन असून त्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे. दुग्धव्यवसाय हा येथील शेतकºयांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून पाणी व चाºयाअभावी हा व्यवसायही अडचणीत आला आहे.शिंदेवाडी गावाच्या हद्दीत तीन पाझर तलाव, दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व दोन गावतळी असून त्यातील पाणी सहा महिन्यांपूर्वीच संपले आहे. तीन हजार लोकवस्ती असलेल्या शिंदेवाडी हद्दीतील कापुरवाडी, इटकाईमळा, जांभळविहिरा, उक्तावस्ती, हांडेवस्ती, कुंभारशेत, वाघाटीमळा तसेच शिंदेवाडी गावठाणसाठी एकच टँकर असून प्रत्येक वस्तीवर ८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा टँकर नादुरुस्त झाल्याने वेळेवर पाणी मिळत नाही, अशी तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे.दुष्काळाचा लाभ मिळावा, यासाठी पारनेरमध्ये समावेशाची मागणीआणे पठार जुन्नर व पारनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असून तीन बाजूंनी पारनेर तालुक्याने वेढलेले आहे. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ जाहीर होत असल्याने तेथील शेतकºयांना अनेक सवलतींचा फायदा मिळतो; परंतु आणे पठारची भौगोलिक स्थिती पारनेरसारखीच असूनही केवळ जुन्नर तालुक्यात असल्याने तेथील शेतकºयांना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा भाग पारनेर तालुक्याला जोडण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई