शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जुन्नरचा पूर्व भाग पाण्याअभावी तहानलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:37 IST

चाऱ्यासाठी जनावरांची वणवण; आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या गावांत पाणीटंचाई

आणे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पठारावर असलेल्या आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या चारही गावांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून शेतकऱ्यांवर जनावरांसाठी पाणी व चाºयासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या या चारही गावांत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने आक्टोबरपासूनच पिण्याच्या पाणीटंचाई भासू लागली आहे. शिंदेवाडी व पेमदरा परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.आणे गावठाण हद्दीत बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी येते; परंतु तेही कधी दिवसाआड, तर कधी दोन दिवसांनी मिळते. इतर वस्त्यांसाठी १० हजार लिटरचा एक टँकर असून त्याच्या दररोज फक्त दोनच फेºया होतात. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी नोंदविल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळते. तेही वस्त्यांवरील विहिरीत सोडल्यावर पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्यासाठी जार विकत घ्यावे लागतात.आणे गावाच्या हद्दीत सहा पाझर तलाव आहे. शिवाय, ओढ्यावर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु, या वर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने सर्व तलाव व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे या वर्षी पिके तर नाहीतच; पण जनावरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पठारावरील अनेक शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय असून हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे; परंतु जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकºयांवर आपली दुभती जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. आणे पठारावर चारही गावांमध्ये पशुवैद्यकीय अहवालानुसार ६,७२६ इतके पशुधन असून त्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे. दुग्धव्यवसाय हा येथील शेतकºयांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून पाणी व चाºयाअभावी हा व्यवसायही अडचणीत आला आहे.शिंदेवाडी गावाच्या हद्दीत तीन पाझर तलाव, दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व दोन गावतळी असून त्यातील पाणी सहा महिन्यांपूर्वीच संपले आहे. तीन हजार लोकवस्ती असलेल्या शिंदेवाडी हद्दीतील कापुरवाडी, इटकाईमळा, जांभळविहिरा, उक्तावस्ती, हांडेवस्ती, कुंभारशेत, वाघाटीमळा तसेच शिंदेवाडी गावठाणसाठी एकच टँकर असून प्रत्येक वस्तीवर ८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा टँकर नादुरुस्त झाल्याने वेळेवर पाणी मिळत नाही, अशी तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे.दुष्काळाचा लाभ मिळावा, यासाठी पारनेरमध्ये समावेशाची मागणीआणे पठार जुन्नर व पारनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असून तीन बाजूंनी पारनेर तालुक्याने वेढलेले आहे. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ जाहीर होत असल्याने तेथील शेतकºयांना अनेक सवलतींचा फायदा मिळतो; परंतु आणे पठारची भौगोलिक स्थिती पारनेरसारखीच असूनही केवळ जुन्नर तालुक्यात असल्याने तेथील शेतकºयांना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा भाग पारनेर तालुक्याला जोडण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई