शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अन् अंत्यसंस्कारासाठीच मिळतोय ई पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST

२४ तासांत पास मंजूर : लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊन करुन संचारबंदी जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी ...

२४ तासांत पास मंजूर :

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊन करुन संचारबंदी जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यंासाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यात प्रामुख्याने वैद्यकीय कारण व जवळच्या नातेवाईकांच्या निधन या दोन प्रमुख कारणांसाठी सध्या ई पास दिला जात आहे. विशेष म्हणजे पासासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची संख्येनुसार तो २४ तासांच्या आत मंजूर होतो.

तब्बल ६० हजार अर्ज

ई पास सेवा सुरू केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत तब्बल ५९ हजार ५७७ अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत आले होते.

पुणे पोलिसांनी आतापर्यंत १६ हजार ७९२ जणांना डिजिटल पास वितरित केला आहे. त्याच वेळी ३१ हजार ७९० अर्ज नामंजूर करुन ते फेटाळण्यात आले आहेत.

ही दिली जातात प्रमुख कारणे

या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक व महत्त्वाच्या कारणासाठी प्रवासाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे मी अडकून पडलो आहे. लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले आहे. याशिवाय अत्यावश्यक नसलेली कारणे असल्यास ई पास दिला जात नाही.

ई पाससाठी असा करावा अर्ज

पोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़ त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत.

जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.

शहरातल्या शहरात अत्यावश्यक कामासाठी ई पासची आवश्यकता नाही. मात्र, घराबाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे योग्य व पटेल असे कारण हवे. अनेक जण शहरातल्या शहरात जाण्यासाठी ई पाससाठी अर्ज करतात. तसेच काही जण अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही वाहतुकीसाठी अर्ज करतात. अशाचे अर्ज फेटाळण्यात येतात.

किती वेळात मिळतो पास

प्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो. हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो.

..........

शहर पोलीस दलाने सेवा प्रकल्पात ई पास देण्याची स्वतंत्र सोय केली आहे. अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट असला तरच प्रामुख्याने डिजिटल पास दिले जात आहेत. त्यामुळे अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट अत्यावश्यक आहे.

श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.