शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By admin | Updated: April 13, 2015 06:14 IST

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे

बापू बल्ौकर, पुणेगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे. ती तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे; मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमाच झाली नाही. फक्त इंदापूर तालुक्यात १00 टक्के वाटप झाले आहे. जिल्ह्यात जानेवारी वगळता दर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. दर महिन्यात तो पावसाचा सामना करीत उरलेले पीक कसेबसे वाचविण्याचा प्रयत्न करतो, तोच पुन्हा पाऊस पडत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ हजार २३४ हेक्टरवरील भात व ४५३.२६ हेक्टरवरील द्राक्षपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानंतर आता १0 व ११ एप्रिल असे दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात अवकाळीने हैदोस घातला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१४ रोजी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी वेल्हा, खेड, आंबेगाव, इंदापूर, बारामती तालुक्यांसाठी चार महिन्यांनंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २ लाख ४४ हजार ९१ लाख ८५0 रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.ही रक्कम ३० मार्च २0१५ रोजी प्रशासनाने तहसीलदारांच्या खात्यात जमाही केली आहे. मात्र, याचे अद्याप या तालुक्यात वाटपच झाले नाही. फक्त इंदापूर तालुक्याने ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.वेल्हेचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, हे अनुदान ३१ मार्च रोजी मंजूर झाल्याने तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नंबर उपलब्ध नसल्याने हे अनुदान लॅप्स करून हेच अनुदान एप्रिल महिन्यात परत येणार आहे. ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे सांगितले.खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे म्हणाले, की धनादेश बनविण्याचे काम सुरू असून, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. ३१ मार्चला अनुदान खात्यात जमा झाल्याने ते परत जाणार नाही. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हे वैयक्तिक अडचणींमुळे बाहेर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वाटपाचे चेक तयार आहेत. मात्र, त्यांच्या सहीमुळे ते खात्यात जमा झाले नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. इंदापूरचे तहसीलदार संजय पावार यांनी मात्र आलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. ते म्हणाले, की मार्च २0१४ रोजी अवकाळीने मोठे नुकसान झाले होते. यावेळची भरपाई वाटप करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बँक खाती घेतली होती. ती आमच्याकडे असल्याने ही रक्कम लगेच त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.