शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:51 IST

१९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली, डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला

पुणे : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी ही जबाबदारी सुद्धा स्वीकारली. त्यांना अतिशय कठोर निर्णय या काळात घ्यावे लागले. डाव्या पक्षांचा त्यांना विरोध होता. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांना समजावून सांगत अत्यंत मोठे क्रांतिकारक बदल केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थकारणाची दिशा बदलली आहे. त्यांचे हे काम इतिहास कधीही विसरणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, गोपाळ तिवारी, रफिक शेख, दत्ता बहिरट, सौरभ अमराळे, अजित दरेकर, मेहबूब नदाफ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली. डॉ. मनमोहन सिंग यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. १९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली. डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला. त्यांच्या काळात अणुवस्त्र करार पारित झाला, या कराराचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांनी या काळात काही आमुलाग्र बदल केले. भारत हा महाशक्ती देश झाला. देशात एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी स्वत:च्या कामातून उमटवला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कायदे, माहिती अधिकार, मनरेगा, शिक्षण कायदा अमलात आणले. त्यांनी हक्क दिल्यामुळे अनेक चांगली कामे झाली. त्सुनामी झाली त्यावेळी स्वत: त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. २००८ चे आर्थिक मंदीचे संकट सोडवले.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग ही अशी व्यक्ती आहे की, त्यांचा कोणताही राजकारणी द्वेष करू शकत नाही. त्यांनी कधीही राजकारणी भावनेने आचरण केले नाही. जागतिक स्तरावर आपल्या देशाला मजबूत अर्थव्यवस्था प्राप्त करून दिली. त्यांना पंतप्रधान पदाचा अभिमान नव्हता तर भारतीयांचा सेवक म्हणून अभिमान होता. त्यांच्या जाण्याने देशातील सामान्य माणूससुद्धा हळहळला. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ प्रतिमा यामुळे जगाच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमी अग्रगण्य राहणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश पेठेतील गुरूद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, समाजवादी पक्षाचे जांबुवंत मनोहर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, विश्वांभर चौधरी, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. ही सभा सुरू होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. यावेळी राहुल ताथोडे, गजानन जोशी, ज्ञानी मुक्तियार सिंह, भन्ते सुदस्सन, बिशप नरेश अंबाला, मौलाना सईद सय्यद आदी धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राची दुधाने यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेManmohan Singhडॉ. मनमोहन सिंगPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपा