शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:51 IST

१९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली, डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला

पुणे : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी ही जबाबदारी सुद्धा स्वीकारली. त्यांना अतिशय कठोर निर्णय या काळात घ्यावे लागले. डाव्या पक्षांचा त्यांना विरोध होता. परंतु, डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांना समजावून सांगत अत्यंत मोठे क्रांतिकारक बदल केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थकारणाची दिशा बदलली आहे. त्यांचे हे काम इतिहास कधीही विसरणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, गोपाळ तिवारी, रफिक शेख, दत्ता बहिरट, सौरभ अमराळे, अजित दरेकर, मेहबूब नदाफ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली. डॉ. मनमोहन सिंग यांचे अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. १९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली. डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला. त्यांच्या काळात अणुवस्त्र करार पारित झाला, या कराराचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांनी या काळात काही आमुलाग्र बदल केले. भारत हा महाशक्ती देश झाला. देशात एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी स्वत:च्या कामातून उमटवला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कायदे, माहिती अधिकार, मनरेगा, शिक्षण कायदा अमलात आणले. त्यांनी हक्क दिल्यामुळे अनेक चांगली कामे झाली. त्सुनामी झाली त्यावेळी स्वत: त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. २००८ चे आर्थिक मंदीचे संकट सोडवले.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग ही अशी व्यक्ती आहे की, त्यांचा कोणताही राजकारणी द्वेष करू शकत नाही. त्यांनी कधीही राजकारणी भावनेने आचरण केले नाही. जागतिक स्तरावर आपल्या देशाला मजबूत अर्थव्यवस्था प्राप्त करून दिली. त्यांना पंतप्रधान पदाचा अभिमान नव्हता तर भारतीयांचा सेवक म्हणून अभिमान होता. त्यांच्या जाण्याने देशातील सामान्य माणूससुद्धा हळहळला. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ प्रतिमा यामुळे जगाच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमी अग्रगण्य राहणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गणेश पेठेतील गुरूद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, समाजवादी पक्षाचे जांबुवंत मनोहर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, विश्वांभर चौधरी, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. ही सभा सुरू होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. यावेळी राहुल ताथोडे, गजानन जोशी, ज्ञानी मुक्तियार सिंह, भन्ते सुदस्सन, बिशप नरेश अंबाला, मौलाना सईद सय्यद आदी धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राची दुधाने यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेManmohan Singhडॉ. मनमोहन सिंगPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपा