शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

घटस्फोट टळला! अन् १५ वर्षे दुभंगलेले कुटुंब लोकन्यायालयात आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:20 IST

लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला

पुणे : लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारात दोन मुले, एक मुलगी अशी फुले फुलली. त्यानंतर त्यांच्यात गैरसमजाचा वणवा पेटला. त्यातून ती मुलांसह वेगळी राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. न्यायालयाने पोटगीही मंजूर केली. त्यांची घटस्फोटासाठी केस सुरू होती. २००९मधील या केससाठी ते दर तारखेला कोर्टात येत. न्यायालयाने पुढाकार घेऊन त्यांचे समुपदेशन केले. मुलांनी आम्हाला दोघेही हवेत, असे सांगितले. त्यानंतर आता ते तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात ही केस शनिवारी निकाली काढण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या प्रयत्नांनी एक कुटुंब पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला.

तो हडपसरला राहत असून एका खासगी कंपनीत कामाला होता. तीन मुलांनंतर त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन ते वेगळे राहू लागले. मुले तिच्याकडे राहू लागली. तिने पोटगीसाठी अर्ज केला. न्यायालयाने तिला पोटगी मंजूर केली. कौटुंबिक हिंसाचाराची केसही दाखल होती. ते नियमित केससाठी न्यायालयात येत होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या हे लक्षात आले. त्यांनी दोघांना समुपदेशनासाठी बोलावले. एकमेकांवर इतके आरोप केले, त्यातून आता एकत्र येण्यासारखे काही राहिले नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी मुलांना बोलावले. मुले तयार झाली. मुलांनी आम्हाला दोघे हवे असल्याचे सांगितले. त्याचा परिणाम झाला. दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सर्व बाबी पूर्ण करून लोक न्यायालयात ते एकत्र आले. इतर पाच प्रकरणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाले. लोकन्यायालयात ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्यावर संमती दर्शविली. या जोडप्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक व विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. दोन्ही घरातील इतरांचा त्यांच्या संसारात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते गेली ५ वर्षे वेगळे राहात होते. तिचा पतीही एकत्र राहायला तयार होता. तुम्ही एकमेकांना वेळ द्या. ॲड. प्रियाल घोष यांनी मुस्लिम कुटुंबातील महिलेला वास्तवाची जाणीव करून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर ते एकत्र आले.

प्रेमविवाहानंतर आर्थिक वादातून विभक्त

त्यांचा प्रेमविवाह झालेला. दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक कारणांवरून वाद होऊ लागले. जवळपास २ वर्षे ते वेगळे राहात होते. या वेगळे राहिल्याचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला. औषधोपचार सुरू झाले. वेगळे झाल्याने होत असलेली फरपट लक्षात घेऊन दोघांनी समंजसपणा दाखविला. ॲड. ययाती कोठेकर यांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि ते पुन्हा एकत्र आले.

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटmarriageलग्नCourtन्यायालयSocialसामाजिक