शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

घटस्फोट टळला! अन् १५ वर्षे दुभंगलेले कुटुंब लोकन्यायालयात आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:20 IST

लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला

पुणे : लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारात दोन मुले, एक मुलगी अशी फुले फुलली. त्यानंतर त्यांच्यात गैरसमजाचा वणवा पेटला. त्यातून ती मुलांसह वेगळी राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. न्यायालयाने पोटगीही मंजूर केली. त्यांची घटस्फोटासाठी केस सुरू होती. २००९मधील या केससाठी ते दर तारखेला कोर्टात येत. न्यायालयाने पुढाकार घेऊन त्यांचे समुपदेशन केले. मुलांनी आम्हाला दोघेही हवेत, असे सांगितले. त्यानंतर आता ते तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात ही केस शनिवारी निकाली काढण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या प्रयत्नांनी एक कुटुंब पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला.

तो हडपसरला राहत असून एका खासगी कंपनीत कामाला होता. तीन मुलांनंतर त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन ते वेगळे राहू लागले. मुले तिच्याकडे राहू लागली. तिने पोटगीसाठी अर्ज केला. न्यायालयाने तिला पोटगी मंजूर केली. कौटुंबिक हिंसाचाराची केसही दाखल होती. ते नियमित केससाठी न्यायालयात येत होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या हे लक्षात आले. त्यांनी दोघांना समुपदेशनासाठी बोलावले. एकमेकांवर इतके आरोप केले, त्यातून आता एकत्र येण्यासारखे काही राहिले नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी मुलांना बोलावले. मुले तयार झाली. मुलांनी आम्हाला दोघे हवे असल्याचे सांगितले. त्याचा परिणाम झाला. दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सर्व बाबी पूर्ण करून लोक न्यायालयात ते एकत्र आले. इतर पाच प्रकरणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाले. लोकन्यायालयात ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्यावर संमती दर्शविली. या जोडप्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक व विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. दोन्ही घरातील इतरांचा त्यांच्या संसारात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते गेली ५ वर्षे वेगळे राहात होते. तिचा पतीही एकत्र राहायला तयार होता. तुम्ही एकमेकांना वेळ द्या. ॲड. प्रियाल घोष यांनी मुस्लिम कुटुंबातील महिलेला वास्तवाची जाणीव करून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर ते एकत्र आले.

प्रेमविवाहानंतर आर्थिक वादातून विभक्त

त्यांचा प्रेमविवाह झालेला. दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक कारणांवरून वाद होऊ लागले. जवळपास २ वर्षे ते वेगळे राहात होते. या वेगळे राहिल्याचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला. औषधोपचार सुरू झाले. वेगळे झाल्याने होत असलेली फरपट लक्षात घेऊन दोघांनी समंजसपणा दाखविला. ॲड. ययाती कोठेकर यांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि ते पुन्हा एकत्र आले.

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटmarriageलग्नCourtन्यायालयSocialसामाजिक