शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

वीर धरणातून विसर्ग थांबवला! नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणात पाणीसाठा किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:00 IST

गेल्या आठवडाभरापासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमालीची घटली आहे

नीरा : काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दिली आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली आहे. नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी या चार धरणात ४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठ्याचे क्षमता आहे. आज रोजी या चारही धरणात ३९ हजार ८०४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठ उपलब्ध आहे. बुधवारी (दि.२२) सकाळी नीरा नदीच्या चारही धरणात एकूण पाणीसाठ्याच्या ८२.३६ टक्के स्थिर झाला आहे. त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्यातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आला आहे. 

गेल्या आठवडाभरापासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमालीची घटली आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून वीर धरणाच्या सांडव्यातून होणारा विसर्ग थांबला असला, तरी नीरा डावा कालवा व उजव्या कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे. 

धरण           एकुण क्षमता(दशलक्ष घनफूट)   आजचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)      टक्के 

भाटघर          २३,५०२.                                              २०,९८०.                          ८८.२१नीरा देवघर     ११,७२९.                                              ८,५८४.                            ७१.६०वीर                ९,४०८.                                               ८,१४५.                            ८६.५८गुंजवणी          ३,६९०.                                                २,५३८.                           ६८.५९एकुण            ४८,३२९.                                              ३९,८०४.                          ८२.३६ 

नदीकाठच्या  रहिवाशांना दिलासा 

पावसाचे प्रमाण घटल्याने आणि धरणातून होणारा विसर्ग थांबल्यामुळे, नीरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका टळला आहे. यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, भविष्यात पावसाची स्थिती आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढिल काळात पावसाची सद्यःस्थितीत लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घेतले जातील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीRainपाऊसPurandarपुरंदरweatherहवामान अंदाजFarmerशेतकरी