शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Dipak Kesarkar: ‘काेण मुख्यमंत्री आहे' यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा; केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

By प्रशांत बिडवे | Updated: September 29, 2024 17:16 IST

राज्याला निश्चितच स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे

पुणे : ‘मुख्यमंत्री’ म्हणून उत्तम कामगिरी केल्यानंतर त्याचा परिणाम हाेताना दिसत आहे. त्या कामांना लाेकांचा प्रतिसाद मिळत आहे. याचेच प्रतिबिंब सर्वेक्षणात उमटत आहे. त्यामुळे निश्चितच राज्याला स्थिरता पाहिजे असेल, तर फिरते मुख्यमंत्रिपद हा फिरता चषक असू शकताे. मुख्यमंत्री पद हे राज्याचे प्रमुख पद आहे. त्यामुळे महायुतीमधील वरिष्ठ नेते विचार करून त्याबाबत निर्णय घेतील,’ असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी केले.

पुण्यात एससीईआरटी येथे आयाेजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबत तिन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील. फिरते मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे, त्यावर विचारणा केली असता केसरकर म्हणाले, ‘काेण मुख्यमंत्री आहे या पेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. राज्याची स्थिरता, लाेकांना आपण काय देऊ शकताे? हे अधिक महत्त्वाचे आहे. युतीचा संपूर्ण पॅटर्न हा संपूर्ण देशात, राज्यात आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

राज्यात अर्थिक शिस्तीचे पालन

महाराष्ट्र हे संपन्न राष्ट्र आहे. जीएसटी संकलनात वाढ हाेत आहे. आर्थिक गरजा लक्षात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळे आर्थिक शिस्तीचे पालन हाेईल.

उद्याेग समूहास शाळा हस्तांतरणात गैर काय?

चंद्रपूर जिल्ह्यांतील एक शाळा अदानी उद्याेग समूहाला हस्तांतरित केली आहे. त्याबाबत बाेलताना केसरकर म्हणाले, उद्याेगसमूहांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. शाळा दत्तक याेजनेत शिक्षण विभाग मंडळे शाळांचा अभ्यासक्रम ठरवीत असतात तसेच शाळेचे व्यवस्थापन खासगी समूहाकडे साेपवीत नाही तर त्यांच्या सीएसआर फंडातून शाळांमध्ये सुधारणा हाेणे अपेक्षित असते. मुलांच्या अधिकच्या सुविधांसाठी काेणी खर्च करीत असेल, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. राज्यात कंत्राटी शिक्षक भरती हा अंतिम ताेडगा नाही. न्यायालयात प्रलंबित खटल्यांमुळे तात्पुरत्या स्वरूपात आदिवासी भागात शिक्षक द्यावा लागताे. ५ ते १० कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमावे लागतील, असेही ते म्हणाले.

मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ

शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन केली असून, त्याचा अंतरिम अहवाल आला आहे. यासह माजी न्यायाधीशांचा सहभाग असलेली एक विस्तारित समितीही स्थापन केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परिपूर्ण सुरक्षा आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत शाळा ते राज्यस्तरीय वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. सखी सावित्री अंमलबजावणी ९८ टक्क्यांवर गेली आहे. शालेय स्तरावर जबाबदाऱ्या साेपविल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षितेबाबत यापुढे काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेDipak Kesarkarदीपक केसरकरEducationशिक्षणPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्री