शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

नियतीनेही त्यांचं अतूट प्रेम मान्य केलं! पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एक तासानंतर पतीनेही घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:08 PM

कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सुख दुःखात त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या.

पुणे: आयुष्यभरासाठी जर पती आणि पत्नी म्हणून सोबत प्रवास करायचा 'पण' केला असेेेल तर मग नात्यात प्रेम, जिव्हाळा पेरावाच लागतो. कष्ट, संघर्ष, मेहनत यांनी संकटांशी झुंजावंच लागते. हे सारं जमलं की, एकमेकांच्या श्वासांची देखील दिलजमाई होऊन जाते. अशाच एका पुण्यातील जोडप्याने अवघ्या एका तासांच्या अवधीने जगाचा निरोप घेतला. 

खडकवासला परिसरात राहणाऱ्या दिनकर पांडुरंग दणाणे (वय ७५) आणि कांताबाई दिनकर दणाणे (वय ६९) असे निधन झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अतिशय साधी राहणीमान,  मनमिळाऊ, बोलका स्वभाव यामुळे असलेल्या या जोडप्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथून १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत कामाच्या शोधत ह्या जोडप्याने पुणे गाठले अन् ते कायमचेच पुणेकर झाले.

कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक संकटात आणि निर्णयावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पतीच्या आजारपणात देखील त्यांनी पूर्ण काळजी घेतली. अत्यवस्थ झालेल्या पतीच्या अगोदर कांताबाई यांनी मृत्यूला कवटाळले आणि आयुष्यभर एकजीवाने राहीलेल्या पती-पत्नीने अंतिम प्रवासही सोबतच केला. 

दिनकर दणाणे यांना केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्रात कामाला होते. त्यांनी दोन मुले आणि एका मुलीचे आयुष्य घडवले. 

केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रामधून २००६ साली सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या दिनकर यांना अगोदर मधुमेह होता. त्यानंतर त्यांची किडनी आणि लिव्हर निकामी झाले. २५ मार्च रोजी डॉक्टरांनी दणाणे यांची मुले आणि पत्नी यांना सांगितले की, ते चोवीस तासांपेक्षा जास्त काळ जगणार नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकून कांताबाई व्यथित झाल्या. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु २५ मार्चला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कांताबाई यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत दिनकर दणाणे यांनीही प्राण सोडला.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवार