शहरं
Join us  
Trending Stories
1
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
2
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
3
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
4
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
5
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
6
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
7
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
8
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
9
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
10
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
11
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
12
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
13
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
14
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
15
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
16
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
17
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
18
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
19
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
20
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:49 IST

नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे.

पुणे : राज्यात २०२४ (मे अखेर) च्या तुलनेत २०२५ (१४ मे अखेर) मध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून निदर्शनास आले. या काळात डेंग्यूमूळे एकही मृत्यू नसल्याची नोंद दिलासादायक आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याची नोंद असली तरी या काळात मृत्यू संख्येत घट झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यातील डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांची २०२३ पासून १४ मे २०२५ पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात १४ मे २०२५ अखेर डेंग्यूच्या २२,३४० तपासण्यांद्वारे १,५९० रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तर याच काळात चिकुनगुन्याच्या एकूण १२,२६४ तपासण्यांमधून चिकुनगुन्याचे ७,४१ रुग्ण आढळून आले, यात एकाही मृत्यूची नोंद नाही.

डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. याचा प्रसार डेंग्यू विषाणू दूषित एडिस इजिप्ती प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. हा डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. याचे साधारण डेंग्यू ताप, रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोम असे तीन प्रकार आहेत. डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा आजार आहे. रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रॉम हा तीव्र प्रकारचा आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते. चिकुनगुन्याच्या विषाणूचा प्रसारही डासांपासून होतो. यात ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे, सांधेदुखी आदी लक्षणे दिसतात. राज्यात १४ मे २०२५ अखेर पर्यंत सर्वाधिक नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पालघर-११६, पुणे-९९, अकोला-८७, सिंधुदूर्ग-६६, नाशिक- ४६ अशी आहे. तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई - ३११, नाशिक-१०८, अकोला-१०२, मालेगाव-५८, कोल्हापूर- २८ अशी आहे.

राज्यातील काही जिल्हा व महापालिका हद्दीत चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. १४ मे २०२५ अखेरपर्यंत सर्वाधिक नोंद असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पुणे- ७७,अकोला-६४, पालघर-४७, सिंधुदुर्ग-४४, ठाणे- ३५ अशी आहे, तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई-१०२, अकोला-८२, सांगली-मिरज-२१, नाशिक-१३, ठाणे- ११ अशी आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याच्या निदानासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील सेंटीनल सेंटरमध्ये रक्त नमुने मोफत तपासले जातात.

आरोग्य कर्मचारी, आरोग्य व आशा सेविकांमार्फत ताप रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना गृहितोपचार, तर तपासणीत आढळणाऱ्या बाधित रुग्णांना पूर्ण कालावधीचा उपचार दिला जातो. संशयित ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एनआयव्ही किंवा राज्यातील निवडक ५० सेंटीनल सेंटरकडे विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात. डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठविले जातात. नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी. घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. विशेषत: दिवसाच्या वेळेस डास चावू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. - डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्यसेवा (हि.ह.व ज.रोग)

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीRainपाऊस