शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 09:49 IST

नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे.

पुणे : राज्यात २०२४ (मे अखेर) च्या तुलनेत २०२५ (१४ मे अखेर) मध्ये डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून निदर्शनास आले. या काळात डेंग्यूमूळे एकही मृत्यू नसल्याची नोंद दिलासादायक आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याची नोंद असली तरी या काळात मृत्यू संख्येत घट झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यातील डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांची २०२३ पासून १४ मे २०२५ पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात १४ मे २०२५ अखेर डेंग्यूच्या २२,३४० तपासण्यांद्वारे १,५९० रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तर याच काळात चिकुनगुन्याच्या एकूण १२,२६४ तपासण्यांमधून चिकुनगुन्याचे ७,४१ रुग्ण आढळून आले, यात एकाही मृत्यूची नोंद नाही.

डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. याचा प्रसार डेंग्यू विषाणू दूषित एडिस इजिप्ती प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. हा डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. याचे साधारण डेंग्यू ताप, रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोम असे तीन प्रकार आहेत. डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा आजार आहे. रक्तस्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिंड्रॉम हा तीव्र प्रकारचा आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते. चिकुनगुन्याच्या विषाणूचा प्रसारही डासांपासून होतो. यात ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे, सांधेदुखी आदी लक्षणे दिसतात. राज्यात १४ मे २०२५ अखेर पर्यंत सर्वाधिक नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पालघर-११६, पुणे-९९, अकोला-८७, सिंधुदूर्ग-६६, नाशिक- ४६ अशी आहे. तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई - ३११, नाशिक-१०८, अकोला-१०२, मालेगाव-५८, कोल्हापूर- २८ अशी आहे.

राज्यातील काही जिल्हा व महापालिका हद्दीत चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. १४ मे २०२५ अखेरपर्यंत सर्वाधिक नोंद असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पुणे- ७७,अकोला-६४, पालघर-४७, सिंधुदुर्ग-४४, ठाणे- ३५ अशी आहे, तर महापालिकानिहाय ही आकडेवारी बृहन्मुंबई-१०२, अकोला-८२, सांगली-मिरज-२१, नाशिक-१३, ठाणे- ११ अशी आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याच्या निदानासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील सेंटीनल सेंटरमध्ये रक्त नमुने मोफत तपासले जातात.

आरोग्य कर्मचारी, आरोग्य व आशा सेविकांमार्फत ताप रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना गृहितोपचार, तर तपासणीत आढळणाऱ्या बाधित रुग्णांना पूर्ण कालावधीचा उपचार दिला जातो. संशयित ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एनआयव्ही किंवा राज्यातील निवडक ५० सेंटीनल सेंटरकडे विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात. डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठविले जातात. नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी. घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. विशेषत: दिवसाच्या वेळेस डास चावू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. - डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्यसेवा (हि.ह.व ज.रोग)

टॅग्स :Puneपुणेdengueडेंग्यूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीRainपाऊस