शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तपासात दिरंगाई; सरकारचा निषेध

By admin | Updated: February 18, 2017 23:51 IST

गोविंद पानसरे हत्या निषेध फेरी : पुरोगामी विचारांचा जागर सुरूच; विविध घोषणा

कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्येच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध असो! पानसरेंच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! चले जाव, चले जाव... मुख्यमंत्री चले जाव, नरेंद्र-देवेंद्र चले जाव, महाराष्ट्र शासन, हाय हाय! अशा घोषणा देत शनिवारी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. गोविंद पानसरे यांच्या हत्येला उद्या, सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समिती व डाव्या विचारसरणीच्या संस्था-संघटनांच्या वतीने पुरागामी विचारांचा जागर करण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी पानसरे हत्येच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. दसरा चौकातून निषेध फेरीला सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्ते शासनविरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आले. त्यानंतर मेघा पानसरे, दिलीप पोवार, उदय नारकर, सुशीला यादव यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गोविंद पानसरे यांची हत्या धर्मांध, प्रतिगामी, सनातनी वृत्तीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी केली आहे. त्यांंच्या हत्येबाबत राज्य शासन, पोलिस विभाग गंभीरपणे चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे कोणतेही काम करीत नाही. किंबहुना गुन्हेगारांना अभय देण्याचेच प्रयत्न करीत आहे, असा संशय निर्माण झाला आहे. म्हणून कोल्हापुरातील सर्व पुरोगामी, डावे पक्ष, संघटना यांचा आम्ही निषेध करीत आहोत. गुन्हेगारांचा वावर कोल्हापुरात होता हे वेळोवेळी तपासात दिसून येते, असे पोलिसच सांगतात. मग त्यांना अटक का करीत नाही, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे. जिल्हाधिकारी म्हणून आमच्या भावना शासनाला कळविण्यात याव्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सर्वांचे मुद्दे शासनापर्यंत पोहोचवू; तसेच सध्या तपास कोणत्या पातळीवर सुरू आहे याची विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी कॉ. अतुल दिघे, एस. बी. पाटील, विक्रम कदम, बाबा यादव, एम. बी. पडवळे, रघुनाथ कांबळे, विक्रम कदम, बाबूराव तारळी, उमेश पानसरे, जमीर शेख, सीमा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोन संशयित आरोपी पकडण्यापलीकडे तपास गेलेला नाही. हे पाऊलसुद्धा पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे उचलले गेले. सनातन संस्थेच्या साधकांनी कोल्हापुरात येऊन प्रक्षोभक भाषणे केली. ‘हे आमचेच हिंदुत्ववादी सरकार आहे. आमच्या नादाला लागू नका,’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.- प्रा. डॉ. मेघा पानसरे गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी केलेल्या तपासाची गती पाहता हे सरकार खुन्यांच्या पाठीशी आहे का? अशी शंका येते. खुन्यांचा शोध लागून त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलने सुरूच ठेवणार आहोत. फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील. - दिलीप पवार प्रमुख मागण्या अशाहत्येचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक व्हावी व तपास अधिकाऱ्यांची बदली केली जाऊ नये.विनय पवार व सारंग अकोळकर या आरोपींना फरार घोषित करण्यात यावे.शासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने तपासाबाबतची भूमिका स्पष्ट करावी.