शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ग्राहक न्यायालयाकडे नाहीत पोस्टासाठी पैसे : निर्णय पाठविण्यास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:03 IST

जिल्हा ग्राहक मंचाकडे पैसेच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून संबंधितांना आदेशाची प्रत पाठविणे शक्य झालेले नाही.

ठळक मुद्देबाजूने निकाल लागूनही न्याय मिळण्यास होतोय अडथळा

पुणे : ग्राहक न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची प्रत प्रतिवादीला पाठविण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाकडे पैसेच नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून संबंधितांना आदेशाची प्रत पाठविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मंचामध्ये न्याय निर्णय होऊनही प्रतिवादींना आदेशाची प्रत न मिळाल्याने न्याय मंचाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदेशानंतर दोन महिन्यांनीदेखील सहस्रबुद्धे यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना आदेशाची मूळ प्रत मिळाली नसल्याचे कारण कंपनीने दिले. तसेच, आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ असल्याचे कंपनीने सांगितले. सहस्रबुद्धे यांनी जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता कार्यालयाने प्रतिवादीस मूळ प्रत पाठविली नसल्याचे मान्य केले. पोस्टेजसाठीचे पैसे उपलब्ध नसल्याने २ महिन्यांपासून अनेक प्रकरणांमध्ये निकालाची मूळ प्रत पाठवली नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.  निकालाची मूळ प्रत, आदेश असूनही तो ४५ दिवसांत न पाठविल्याने ग्राहक मंचच्या निर्णयाचा त्यांच्याच कार्यालयाकडून अवमान झाला आहे. त्यामुळे साठ दिवस उलटूनही नुकसानभरपाईची रक्कम ग्राहकास मिळाली नाही. तसेच, प्रतिवादीसदेखील व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच, प्रतिवादीस वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी असलेली मुदतदेखील संपुष्टात आली असण्याची शक्यता आहे. तब्बल चार लाख कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या राज्य सरकार ग्राहक मंचाला पोस्ट खर्चाचे पैसे उपलब्ध करून देता येत नसेल, तर ती सरकारवरील नामुष्की असल्याची प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी दिली. .............

अंमलबजावणी निकालानंतर ४५ दिवसांत करावीसजग नागरिक मंचचे कार्यकर्ता विश्वास सहस्रबुद्धे यांनी दि. १० जानेवारी २०१७ रोजी युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, पुणे व हेल्थ इंडिया टी. पी. ए. मुंबई या कंपन्यांवर त्यांना आजारपणाच्या विम्याची रक्कम मिळावी, यासाठी दावा दाखल केला होता. ग्राहक मंचाने त्या दाव्याचा निकाल १० जुलै २०१९ रोजी सहस्रबुद्धे यांच्या बाजूने दिला. मंचाने ९ टक्के व्याजासह २.८० लाख रुपये देण्याचा आदेश दिला. व्याजाची आकारणी २१ आॅगस्ट २०१५ पासून करावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी ३० हजार रुपये द्यावेत, असेही आदेशात नमूद केले होते. या आदेशाची अंमलबजावणी निकालानंतर ४५ दिवसांत करण्यास बजावले होते....... 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPost Officeपोस्ट ऑफिस