शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नाल्यांवर बांधकामे, सिमेंटीकरण, अरुंद नदीपात्र! पाण्याची वाट बुजवली अन् पुराने शहराची वाट लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:24 IST

शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही

पुणे : शहरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याचे ‘आरोग्य’ बिघडले असून, त्यामुळे संततधार पावसामुळे देखील पुण्याचे जनजीवन विस्कळीत होत आहे. पाणी वाहून नेण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याने पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. ही प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी पुणेकरच जबाबदार आहेत. कारण अनेकांनी नाल्यांवर बांधकामे केली, सिमेंटीकरण केले, नदीपात्र अरुंद,  नाले बदलले. परिणामी पावसाच्या पाण्याला वाटच मिळत नाही.(Pune Heavy Rain) 

काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पाच-पाच दिवस संततधार पाऊस पडत असे. तरीदेखील कुठेही पूरस्थिती निर्माण व्हायची नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये या घटना नेहमी होत आहेत. कमी वेळेत अधिक पाऊस म्हणजे ढगफुटीसदृश पावसानेही यापूर्वी पुणे तुंबले आहे. परंतु, बुधवारी रात्रीपासून मात्र जोरदार पाऊस नव्हता. केवळ संततधार होता. त्यानेही पुण्याची अवस्था बिकट बनली. त्याचाच अर्थ पुणे शहराची पावसाला तोंड देण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत, भूमिगत झरे आणि नाल्यांचे मार्ग बदलले आहते. परिणामी पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले. या सिमेंटीकरणाच्या बांधकामामुळे शहरातील ४५ टक्के लहान-मोठे जलस्रोत गायब झाले आहेत. जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहांना धक्का लागला आहे, परिणामी पुराचा धोका वाढत आहे. संततधार पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, काही ठिकाणी संरक्षक भित कोसळली. सिंहगड रस्त्यावर तर पाणीच पाणी झाले. पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने, वाहून जाण्यासाठीचे मार्ग बंद केल्यानेच पुराचा धोका वाढत आहे.

जलस्त्रोत नाहीसे !

भूगोल व जलस्त्रोताचे अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिओग्राफिक इन्व्हायर्नमेंट ऑफ पुणे ॲन्ड सराऊंडिग’ या विषयावर संशोधन केले आहे. पुणे शहरात गेल्या तीन दशकांत तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत नाहीसे झाले आहेत. शहरात संततधार तर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. दिवसभरात १०० मिमी पाऊस झाला. खरंतर पाणी खूप मुरलं पाहिजे, जे मुरत नाही. केवळ ५ टक्के पाणी मुरत आहे. ९५ टक्के पाणी वाहून जाते. आता नाले कमी झाले. पाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा नाल्यात घाण अडते आणि तुंबते. ते काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते, अशी माहिती डॉ. गबाले यांनी दिली.

पाणी का साठते त्याची कारणे ?

- शहरातील नाले अरूंद झाले

- वाटेल तसे नाले-ओढ्यांचे मार्ग बदलले- टेकडी उतारावरील प्रवाह अडवले

- पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत- नाले, ओढ्यात राडारोडा टाकल्याने पाणी तुंबते

- नाल्यात बऱ्याचदा खूप कचरा टाकल्याने पाणी तुंबतो- सिमेंटीकरणामुळे पाणी जिरणे कमी झाले

- ९५ टक्के पावसाचे पाणी वाहून जाते

...मग पूर येणारच ना !

शहरामध्ये सिमेंटीकरणामुळे रस्ते गुळगुळीत बनले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. नाले गायब केले असून, तिथे इमारती उभ्या आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. सिंहगड परिसरात तर अशाप्रकारचे बांधकाम खूप आहे. खरंतर शहरामध्ये पाणी तुंबण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. शहरातील रस्ते तयार करताना या पावसाच्या पाण्याचा विचार केलेला नाही. पाऊस पडल्यानंतर २५ ते ३० टक्के पाणी जमिनीत मुरते. पण आता केवळ ५ टक्के पाणी मुरते. बाकीचे रस्त्यावरून वाहते. मग पूर येणारच आहे.

स्वतंत्र विभाग हवा !

शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही. महापालिकेने योग्य नियोजन करुन पाणी मुरण्यासाठी उपाय करणे अपेक्षित आहे. त्यासाठी धोरण ठरवायला हवे. महापालिकेत त्यासाठी स्वतंत्र विभागच हवा. त्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल. शहरातील पूरस्थितीबाबत नुकतेच एक चर्चासत्र झाले. त्यातही नगररचना करताना त्याविषयाचा एक विभागच हवा आणि केवळ या आपत्तीवर काम करणारा हवा, अशी मागणी झाली होती.

- शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट. नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर.

- ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते.

- शहरातील ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाriverनदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकenvironmentपर्यावरण