शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

By राजू इनामदार | Updated: November 12, 2024 21:20 IST

'विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला'

राजू इनामदार

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू नव्हते ते काँग्रेसने सांगावे. आता आम्ही ३७० कलम काढल्यानंतर ते परत लागू करा असा प्रस्ताव काँग्रेसने केला. मागील ७० वर्षे पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झाली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य केले. यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचारसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असे म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही.

विधानसभा निवडणुकीतील पुणे व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व महायुतीचे ३१ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून, ‘पुण्यातील लाडक्या बहिणींनो व भावांनो, माझा नमस्कार’ अशी मराठीतून भाषणाला सुरूवात करत मोदी यांनी त्यानंतर मात्र काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला.

मोदी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटकमध्ये निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. तिथे दररोज घोटाळे समोर येत आहेत. जनतेकडून लुटलेला पैसा काँग्रेस महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरत आहेत. डॉ. आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू केले नाही याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. आम्ही देशातील १४० कोटी जनतेच्या पाठिंब्याने ३७० कलम जमिनीत गाडले. काँग्रेसने ते परत लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. ते आता पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला अशी टीका मोदी यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी युवराजांच्या तोंडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले. सत्तेकरता काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचा खेळ खेळला. आताही ते दलित, आदिवासी मागासवगर्यीय यांची एकजूट तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहायला हवे. ते तुम्हाला कमकुवत करतील व नंतर आरक्षण काढून घेतील. एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी घोषणाही मोदी यांनी दिली.

महायुती आहे तरच राज्याची गती व प्रगती आहे. राज्यात अनेक ठिकाणी फिरलो, सगळीकडे जनतेचा पाठिंबा मिळत आहे. पुण्यात येतानाही लोक रस्त्यावर उभे राहून अभिवादन करत होते. आगामी काळात महायुती सरकार राज्यात वेगाने विकासकामे करेल. पुण्यालाही त्याचा चांगला फायदा होईल. देशातील नागरिकांच्या आकांक्षा हाच आमच्या कामाचा आधार आहे. महायुतीच्या आधीच्या सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे ते त्यावर बोलू शकत नाही असे मोदी म्हणाले.

जम्मू कश्मिरसाठीचे आम्ही रद्द केलेले कलम पुन्हा रागू करण्याचा प्रस्ताव करणाऱ्या काँग्रेसला दिवा दाखवण्याची गरज आहे असे म्हणत मोदी यांना श्रोत्यांना मोबाईलची लाईट लावण्याचे आवाहन केले. श्रोत्यांनी त्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी सुरू करताच संपूर्ण मैदान उजळून निघाले. मोदी यांनी ३६ मिनिटे भाषण केले. संपूर्ण भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शऱ्द पवार) पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांच्यावर एका शब्दाचीही टीका केली नाही. त्याची चर्चा लगेचच सभास्थळी सुरू झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPuneपुणे