शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुकाबला ‘टपोरी’ डॉनशी - अग्रलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST

डॉनचे नाव घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी डॉनची आक्रमकता आत्मसात केली. म्हणूनच सातत्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करू ...

डॉनचे नाव घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी डॉनची आक्रमकता आत्मसात केली. म्हणूनच सातत्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करू शकला. लढवय्ये, जिंकण्यासाठी अखेरपर्यंत बाजी लावणारे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खासीयत आहे. पण, त्यात डॉनची सभ्यता नाही. डॉननंतरची ऑस्ट्रेलियन आक्रमकता म्हणजे शेरेबाजी, चिडखोरपणा, प्रतिस्पर्ध्याबद्दलचा अनादर आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती असेच समीकरण बनले आहे. अपवाद अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा खेळाडूंचा. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट म्हणजे गावंंढळ, टपोऱ्या डॉनची कहाणी बनून राहिले आहे.

येत्या शुक्रवारी ब्रिस्बेनच्या मैदानात भारताचे वाघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कांगारूंशी भिडतील. बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला हा चौथा आणि अंतिम सामना केवळ मालिकेचे जेतेपद निश्चित करण्यापुरता मर्यादित उरलेला नाही. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधल्या टोकदार संघर्षाचे पडसाद या सामन्यावर आहेत. हा संघर्ष मैदानी मुकाबल्याचा नाही. भारतीय खेळाडूंना वंशद्वेषाचा, वर्णभेदी शेऱ्यांचा सामना करावा लागला आहे. चेंडूच्या आकारात फेरफार केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला यापूर्वीच शिक्षा झालेली आहे, तरी स्वभावात बदल शून्य. ऋषभ पंतची लय बिघडवण्यासाठी या महाशयांनी त्याच्या ‘बॅटिंग गार्ड’ची खूण मिटवण्याचा प्रयत्न केला. कर्णधार टीम पेनने स्वत: तीन झेल सोडले, पण तरीही सातव्या क्रमाकांच्या फलंदाजालाही शेरेबाजी करण्याची किडकी वृत्ती त्याने दाखवली. अंगावर धावून जाणारे गोलंदाज तर नेहमीचेच. हे कमी की काय म्हणून भारतीय क्षेत्ररक्षकांनाही प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी शेरे ऐकवले गेले. खेळाडू म्हणून पराभूत होणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू माणूस म्हणूनही अपयशी ठरले आहेत.

या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाला शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत भारत असेल. पहिला सामना ज्या झोकात यजमानांनी जिंकला तो तोरा पुढच्या दोन्ही सामन्यांत भारताने उतरवला. विशेष म्हणजे, कोण्या एकाच्या कामगिरीवर नव्हे तर सांघिक प्रदर्शनाच्या बळावर. ऑस्ट्रेलियासाठी हीच मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. कर्णधार विराट कोहलीने बापपणाच्या रजेसाठी माघार घेतली. पाठोपाठ मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा अशी फळीच जखमी झाली. पण, यामुळे भारतीय संघाची बेडर वृत्ती आणि बलदंड मन जराही उणावले नाही. जितके मोठे आव्हान तितकी जबरदस्त कामगिरी असेच गेल्या दोन कसोटी सामन्यांचे विश्लेषण करावे लागते. हनुमा विहारी, आर. आश्विन, ऋषभ पंत या त्रयीने दाखवलेली जिगर, चेतेश्वर पुजाराची अखंड साधना यांनी ऑस्ट्रेलियन उद्धटपणाचा पालापाचोळा केला. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचा धीरोदात्तपणा ऑस्ट्रेलियाच्या अनाठायी आक्रमकतेपुढे अधिक उंच झाला. मितभाषी अजिंक्यही दोन सामन्यांतच 'डॉन' झाला. पण ते मैदानातल्या कामगिरीवर, अनावश्यक बडबड करून नाही. मालिकेपूर्वी ‘चार-शून्य’च्या गमजा मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजिंक्यने पाठ टेकायला लावली असली, तरी जखमी खेळाडूंच्या वाढत्या यादीमुळे अजिंक्यसाठी ‘लास्ट लाफ’ अधिक आव्हानात्मक ठरला आहे. हे हास्य अजिंक्यने मिळवले तर ऑस्ट्रेलिया नामक टपोरी ‘डॉन’ची पुरती फजिती निश्चित आहे.