शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीश योग्य तेच बोलले, घटनात्मक तरतुदींचा भंग झाला होताच - डॉ. उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:26 AM

न्या. चंद्रचूड यांच्या या वक्तव्याने आता निकालाविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले...

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जे काही बोलले ते अत्यंत योग्य आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून घटनात्मक तरतुदींचा भंग झालाच होता, असे मत राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. न्या. चंद्रचूड यांच्या या वक्तव्याने आता निकालाविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

सत्तासंघर्षांच्या काळातील राज्यपाल कोश्यारी यांच्या कृतीबद्दल न्या. चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान शंकास्पद असे भाष्य केले आहे. त्याचबरोबर बहुमत सिद्ध करण्यास सांगणे, त्यासाठी विधानसभेचे अधिवेशन परस्पर बोलावणे, सरकारकडे बहुमत राहिलेलीच नाही, अशी स्वत:च खात्री करून घेणे अशा अनेक विषयांवर न्या. चंद्रचूड यांनी मत व्यक्त केले. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारीही (दि.१६) सुरू राहणार आहे. त्यानंतर निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल.

डॉ. बापट म्हणाले की, सत्तासंघर्ष सुरू होता त्या काळात आपणही असेच मत व्यक्त करीत होतो. तत्कालीन राज्यपालांची कोणतीही कृती घटनेच्या आधारावर बसत नाही. घटनेच्या कलम १६३ नुसार राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. व्यक्तिगत तारतम्य ठेवण्याबाबत राज्यपालांसाठी ज्या काही तरतुदी आहेत, त्याही स्वयंस्पष्ट आहेत. त्यामध्ये ते सरकारकडून माहिती मागवू शकतात, राज्यात काही पेचप्रसंग झाला आहे, असे लक्षात आले तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात. एखादे विधेयक त्यांना घटनाबाह्य वाटले तर ते काही काळ बाजूला ठेवू शकतात.

तत्कालीन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीशिवाय विधानसभेचे अधिवेशन बोलावले, त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही, सरकारकडे बहुमत नाहीच अशी स्वत:च खात्री करून त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले, या सर्व कृती घटनाबाह्य केल्या, असे डॉ. बापट यांनी ठामपणे सांगितले.

न्या. चंद्रचूड जे काही बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत असे म्हणता येणार नाही; कायदा, घटना यांना लक्षात घेऊन, त्यात काय म्हटले आहे, त्याचा व्यवस्थित अर्थ लावून ते बोलले आहेत, त्यामुळेच त्याला महत्त्व आहे, असे डाॅ. बापट म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील या खटल्यातून व त्याच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्याला कायद्याचे अधिष्ठान मिळणार आहे, तसेच पुढेही त्याचे दाखले दिले जातील. त्यामुळे आता या संत्तासंघर्षांच्या निकालाविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.

आपली राज्यघटना इंग्लडंच्या धर्तीवर तयार केली आहे. तिथे राजा हा नामधारी असतो व खरे जबाबदार पंतप्रधान, मंत्रिमंडळच असते. आपलीही केंद्रातील रचना तशीच आहे. संघराज्य असल्याने राज्यातही तशीच आहे. राज्यपालांवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे ते घटनेनेच आहे, त्यांना जी सूट दिली आहे ती मर्यादित आहे. या प्रकरणांमध्ये अनेकदा त्याचा भंग झाला हे स्पष्ट आहे.

- डॉ. उल्हास बापट, घटनातज्ज्ञ.

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय