शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यासाठीच्या वाढीव कोट्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:10 IST

सध्या शहरात २४ बाय सात या योजनेतून नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू

पुणे : शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महापालिका खडकवासला प्रकल्प तसेच भामा आसखेड धरणातून सुमारे २२ टीएमसी पाणी उचलते. त्यातील आठ टीएमसी पाण्याची जुन्या जलवाहिन्यांमुळे गळती होते. सध्या शहरात २४ बाय सात या योजनेतून नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दीड दोन वर्षांत ही गळती कमी होईल. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जायका प्रकल्पाच्या टेंडरचे कामही सुरू आहे. तेही येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल. पाण्याची गळती झाल्याने आठ टीएमसी पाणी वाचेल. त्यामुळे शहर व ग्रामीणचा सध्याचाच कोटा कायम राहील, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे पुण्यासाठीच्या वाढीव कोट्याची मागणी पाटील यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळली आहे.

कालवा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात नव्याने २३ गावांचा समावेश झाले आहे. त्यामुळे शहराला लागणारा पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून मिळावा असे पत्र महापालिका आयुक्त व्किरम कुमार यांनी जलसंपदा विभागाने दिले होते. त्यावर पालकमंत्रीच निर्णय घेणार असे उत्तर जलसंपदा विभागाने दिले. पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे पाटील या मागणीकडे सकारात्मक पद्धतीने बघतील अशी पुणेकारंची आशा होती. मात्र, ती आता फोल ठरली आहे.

मेपर्यंत गळती कमी होणार

पाटील म्हणाले, “सध्या धरणांमध्ये गेल्या वर्च्च्या तुलनेत चांगला पाणीसाठी आहे. जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत पाणीसाठ्याचा आढावा घेऊन शहराच्या व ग्रामीण भागाच्या शेतीच्या पाण्याबाबत आढावा घेतला जाईल. शहरात सध्या जुन्या जलवाहिन्यांमुळे ३५ टक्के अर्थात आठ टीएमसी पाणीगळती होते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या मेपर्यंत हे काम पूर्ण झाल्यावनंतर हे आठ टीएमसी पाणी वाचेल. तसेच गेल्या सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेला जायका प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत जवळजवळ बंद पडला होता. त्याला आता गती देण्यात आली आहे. त्याचे सध्या टेंडरचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षांत तेही काम पूर्ण होईल. त्यात शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी ग्रामीण भागातील शेती, उद्योगांना दिले जाईल. त्यामुळे त्यांचीही मागणी पूर्ण होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठीचा प्रश्न निर्माण होणार नाही.”

जादा पाणीवापर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे

पुणेकर दरमाणशी जास्त पाणी वापरतात असा जलसंपदा विभागाचा आरोप आहे, याबाबत विचारले असता पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा आरोप पुणेकरांवर होत आहे. प्रत्यक्षात पाणीगळती जास्त असल्याने पाणीवापराचा आकडा वाढला आहे. पुणेकर जास्त पाणी वापरत नाहीत. पाणीगळती कमी झाल्यावर हा आकडा कमी होईल, असेही ते या वेळी म्हणाले. समाविष्ट गावांमध्ये जलसंपदा विभागाकडून पाणी दिले जाते. मात्र, त्यावर महापालिका पाणीपट्टी आकारते. जलसंपदा विभाग या पाण्याचे बिल महापालिकेकडून घेत. त्यामुळे महापालिकेने आकारलेली पाणीपट्टी योग्य असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र, या गावांच्या विकास आराखड्याचे काम सध्या सुरू आहे. यापूर्वी ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम पूर्ण झाले असून चारशे कोटींची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे २३ गावांच्या विकास आराखड्याचे काम पूर्ण झाल्यावर हा प्रश्नही निकाली निघेल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मुळशीचे पाणी नाहीच

मुळशी धरणातून गेल्या वर्षी एक टीएमसी पाणी मिळाले होते. मात्र, यंदा तशी गरज नाही. या धरणातून वीज निर्मिती केली जाते. ते पाणी खाली जाते. पुण्यासाठी हे पाणी आणण्यासाठी पुन्हा वर आणावे लागणार आहे. त्यासाठी मोठा खर्च असल्याने ते व्यवहार्य नाही. त्यासाठी वीजनिर्मिती न केल्यास केल्यास तेच पाणी मुळा नदीत आणात येईल, व त्यापोटी टाटा पॉवरला भरपाई द्यावी लागेल. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSocialसामाजिकPoliticsराजकारणWaterपाणी