शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST

खोडद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ...

खोडद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाल्याने खोडद परिसरात व जुन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खोडद येथील जागतिक दर्जाची रेडिओ दुर्बीण असलेल्या जीएमआरटी प्रकल्पात डॉ. नारळीकर हे अनेकदा आले असल्याने खोडदकरांच्या मनात डॉ. नारळीकर यांच्याविषयी आत्मीयता आणि आदर आहे.

साहित्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळणार असल्याने संशोधन, लेखन व वैज्ञानिक क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रातही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. नारळीकर यांनी विज्ञानासारख्या किचकट व अवघड क्षेत्रात सोपा करून सर्वांना समजेल व आवडेल अशा रीतीने मातृभाषेत पुस्तके लिहिली आहेत. विज्ञान कथालेखक म्हणून एकाहून एक ज्ञानवर्धक आणि रंजक भाषांतील पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. विज्ञान संशोधनातील त्याच्या योगदानामुळे देशाचा सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना भारत सरकारने गौरवलेले आहे. तर 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा आणि अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे.

"जागतिक कीर्तीचे नामवंत खगोलशास्त्रज्ञ, गणिततज्ञ आणि विज्ञान साहित्यातील महर्षी डॉ. नारळीकर यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही गौरवशाली आहे. साहित्य संमेलनाकडे विज्ञानप्रेमी व तरुणांचा पुढील काळात नक्कीच कल वाढेल.डॉ.नारळीकर यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे सर्व तरूण व बाल वैज्ञानिकांना प्रेरणा मिळून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होणार आहे. इतर सर्वांना या ज्येष्ठ महामेरूसोबत चर्चा करण्याची व उत्तम श्रोता बनण्याची संधी मिळणार आहे."

- डॉ. जे. के. सोळंकी

वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए, पुणे

"डॉ.जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञाला हा बहुमान दिला जातोय याचा सार्थ अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे डॉ. नारळीकरांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व आहे. कथा सर्वांनाच आवडत असतात, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या व त्यांची उत्तरे शोधणाऱ्या त्यांच्या विज्ञानकथा रंजक असून विचार करणाऱ्या वृत्तीस आणि शोधक दृष्टिकोनास पोषक ठरतात, असे मला प्रकर्षाने वाटते. महाराष्ट्र शासन साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांची पुस्तके ज्ञान विज्ञानाचा समन्वय घालून वाचकाला खूप दूर ,खूप सखोल आणि अंतराळातील गूढ अगम्य अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात."

- जालिंदर डोंगरे मामा

साहित्यिक, खोडद, ता. जुन्नर

"डॉ. नारळीकरांनी विज्ञान विषय हा कथेच्या माध्यमातून सोपा करून सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे. प्रत्येक विषयाचा हा इतर विषयांशी संबंध असतोच. बालभारतीच्या पुस्तकात अनेक वैज्ञानिक धडे समाविष्ट केलेले आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वैज्ञानिक असल्याने अनेक वैज्ञानिक विचार त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून सर्वसामान्यांपर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचतील. डॉ.नारळीकरांमुळे तरुण युवक मोठ्या प्रमाणात साहित्य क्षेत्राकडे वळतील. त्यामुळे अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल.

रतिलाल बाबेल

अध्यक्ष, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ

खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांविषयी जाणून घेताना डॉ.जयंत नारळीकर.२९ फेब्रुवारी २००८ चे संग्रहित छायाचित्र.