Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:28 IST2025-09-30T10:27:44+5:302025-09-30T10:28:12+5:30
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती

Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय ७०), तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), अमन युसूफ पठाण (२५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगू (२०), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (३६), मुनाफ रिजाय पठाण (२८, रा. नाना पेठ) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, तर यापूर्वीच लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०) यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ॲड. विलास पठारे यांनी केली, तर आरोपी पोलिस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.