शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा बळीराजाला मदत करा - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:45 IST

केंद्र सरकारकडून मदत येणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटूनही अद्याप तरी मदतीची घोषणा केली गेलेली नाही.

पुणे: कृषी विभागाने यापूर्वी शेतकऱ्यांना काय मदत केली, याचे आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा बळीराजाला आधार देणे गरजेचे आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

शिरूर मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी सोमवारी निसर्ग मंगल कार्यालय येथे बैठक घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मराठवाड्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला आता तातडीची व दीर्घकालीन मदतीची अपेक्षा आहे. पुरानंतर शेतातील मातीच वाहून गेली असल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. मागे काय मदत केली, त्याची आकडेवारी तोंडावर फेकण्यापेक्षा आता बळीराजाला ठामपणे मदतीची खरी गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार काय करतेय. हे महाराष्ट्राला कळू द्या. केंद्र सरकारकडून मदत येणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, मात्र अद्याप तरी मदतीची घोषणा केली गेलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी २० लाख ५० हजारांची तरतूद होते, तर मग सर्वसाधारण शेतकऱ्यांना पहिली मदत तीन हजारांची केली. आपल्यापेक्षा लहान असलेला पंजाब राज्य पुराच्या वेळी आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करतो. मग आपल्याही शेतकऱ्यांना ठोस मदत मिळणे व शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अठरापगड जातींनी एकत्र येऊन जगले पाहिजे.

सरकारने सामाजिक सलोखा स्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारमधील लोक दोन समाजात दरी निर्माण करण्याचे काम करत आहेत. सामाजिक शांतता गरजेची आहे. कोणत्याही अशांत प्रदेशात विकासाचे काम होत नाहीत, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Help farmers, don't throw statistics: Amol Kolhe to Agriculture Dept.

Web Summary : MP Amol Kolhe demands comprehensive drought relief for farmers instead of presenting past aid figures. He criticized insufficient aid compared to Punjab and urged the state government to support farmers and foster social harmony.
टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीMONEYपैसाRainपाऊसMarathwadaमराठवाडा