शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

सर्वपक्षीय आंदोलनानंतर कुकडी डाव्या कालव्याचे पाणी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 08:30 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले

पुणे (नारायणगाव): कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले. आता कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणात अवघे ०.८२ टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी आजमितीला सर्व धरणांत उपयुक्त असा १३.८५ टक्के पाणीसाठा होता.

राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर धरणातून पाणी बंद करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी तिसरे आवर्तन म्हणून येडगाव धरणामधून दि. ६ एप्रिल २०१९ रोजीपासून उन्हाळी आवर्तन सुरू होते. हे आवर्तन ४५ दिवस सुरू होते. राजकीय उदासीनता आणि पाणी सोडताना वारंवार होणारा बदल व कालवा सल्लागार समितीचे नियोजन फसल्याने कुकडी प्रकल्पातील वडज, पिंपळगाव जोगा आणि डिंभे ही धरणे रिकामी झाली आहेत. दर वर्षी पिंपळगाव जोगा धरणातूनच मृतसाठा काढण्यात येतो; मात्र या वर्षी प्रथमच  डिंभे आणि वडज या धरणांतून मृतसाठा काढण्यात आलेला आहे. कुकडी प्रकल्पातील पाच धरणांपैकी माणिकडोह धरणामध्ये अवघे १.४० टक्के, तर येडगाव धरणामध्ये पिंपळगाव जोगा धरणातून घेण्यात आलेल्या पाण्यामुळे अवघे ५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत सरासरी पाणीसाठा अवघे ०.८२ टक्के आहे. गेल्यावर्षी २१ मे २०१८ अखेर उपयुक्त पाणीसाठा ४३३२ द.ल.घ.फू. (१३.८५ टक्के) होता. दुष्काळी परिस्थितीत कालवा सल्लागार समितीने धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केलेले नाही. नगर व सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी जलसंपदा विभागात असल्याने तसेच या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व मंत्री यांनी दबाव तंत्र अवलंबून पाच धरणांतील पाणीसाठा गरज नसताना पळविला.

पहिले रब्बी आवर्तन ६ टीएमसीचे असते; मात्र सल्लागार समितीने १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन साधारण ६३ दिवस सुरू होते. वास्तविक, ६ टीएमसी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी अर्थात अडीच आवर्तने इतके पाणी एकाच वेळी सोडल्याने ऐन दुष्काळात पाण्याचे नियोजन फसले. राजकीय दबावामुळे पहिल्याच आवर्तनात धरणातील ५० टक्के पाणी गेले. त्यानंतर कालवा समितीमध्ये २ मार्च २०१९ रोजी दुसरे आवर्तन म्हणून ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, पहिले आवर्तन १४.५ टीएमसी सोडल्याने दुसरे आवर्तन न सोडता थेट उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. तरीदेखील दुसरे आवर्तन सोडण्यात आले. त्यानंतर दि. ६ एप्रिल २०१९ पासून उन्हाळी आवर्तन म्हणून तिसरे आवर्तन सोडण्यात आले. तब्बल ४५ दिवसांनंतर पाणी बंद करण्यात आले.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळWaterपाणी