शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सर्वपक्षीय आंदोलनानंतर कुकडी डाव्या कालव्याचे पाणी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 08:30 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले

पुणे (नारायणगाव): कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले. आता कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणात अवघे ०.८२ टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी आजमितीला सर्व धरणांत उपयुक्त असा १३.८५ टक्के पाणीसाठा होता.

राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर धरणातून पाणी बंद करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी तिसरे आवर्तन म्हणून येडगाव धरणामधून दि. ६ एप्रिल २०१९ रोजीपासून उन्हाळी आवर्तन सुरू होते. हे आवर्तन ४५ दिवस सुरू होते. राजकीय उदासीनता आणि पाणी सोडताना वारंवार होणारा बदल व कालवा सल्लागार समितीचे नियोजन फसल्याने कुकडी प्रकल्पातील वडज, पिंपळगाव जोगा आणि डिंभे ही धरणे रिकामी झाली आहेत. दर वर्षी पिंपळगाव जोगा धरणातूनच मृतसाठा काढण्यात येतो; मात्र या वर्षी प्रथमच  डिंभे आणि वडज या धरणांतून मृतसाठा काढण्यात आलेला आहे. कुकडी प्रकल्पातील पाच धरणांपैकी माणिकडोह धरणामध्ये अवघे १.४० टक्के, तर येडगाव धरणामध्ये पिंपळगाव जोगा धरणातून घेण्यात आलेल्या पाण्यामुळे अवघे ५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत सरासरी पाणीसाठा अवघे ०.८२ टक्के आहे. गेल्यावर्षी २१ मे २०१८ अखेर उपयुक्त पाणीसाठा ४३३२ द.ल.घ.फू. (१३.८५ टक्के) होता. दुष्काळी परिस्थितीत कालवा सल्लागार समितीने धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केलेले नाही. नगर व सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी जलसंपदा विभागात असल्याने तसेच या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व मंत्री यांनी दबाव तंत्र अवलंबून पाच धरणांतील पाणीसाठा गरज नसताना पळविला.

पहिले रब्बी आवर्तन ६ टीएमसीचे असते; मात्र सल्लागार समितीने १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन साधारण ६३ दिवस सुरू होते. वास्तविक, ६ टीएमसी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी अर्थात अडीच आवर्तने इतके पाणी एकाच वेळी सोडल्याने ऐन दुष्काळात पाण्याचे नियोजन फसले. राजकीय दबावामुळे पहिल्याच आवर्तनात धरणातील ५० टक्के पाणी गेले. त्यानंतर कालवा समितीमध्ये २ मार्च २०१९ रोजी दुसरे आवर्तन म्हणून ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, पहिले आवर्तन १४.५ टीएमसी सोडल्याने दुसरे आवर्तन न सोडता थेट उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. तरीदेखील दुसरे आवर्तन सोडण्यात आले. त्यानंतर दि. ६ एप्रिल २०१९ पासून उन्हाळी आवर्तन म्हणून तिसरे आवर्तन सोडण्यात आले. तब्बल ४५ दिवसांनंतर पाणी बंद करण्यात आले.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळWaterपाणी